AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’, जयंत पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. त्यावरून जयंत पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला.

'...तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय', जयंत पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
jayant patil-narendra modi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 6:02 AM
Share

मुंबई : आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच… हे जयंत पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून अनेकदा येतो. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगलं काम केलं आहे, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल, तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा मी विचार करतोय !’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला.

उत्तर प्रदेश टीकेच्या केंद्रस्थानी का?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोनामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानं मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडली. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन केले. सरकारने मनाई केल्यानंतरही लोकांनी गंगेच्या काठावर मृतदेह पुरले. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसले. त्यांची मोजदाद करणंही शक्य राहिलं नव्हतं.

गंगेच्या काठावर मृतदेह दफन केलेल्या आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावनाही निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती.

मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले. प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू होते. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत होते..

हेही वाचा :

सरकारच्या इशाऱ्यानंतरही गंगेच्या तीरावर मृतदेहांचं दफन सुरूच, प्रेतांची मोजदादही अशक्य

रात्रीत 16 ते 17 मृत्यू पाहिले, उत्तर प्रदेशात ऑक्सिजन न मिळाल्यानं मोहम्मद शमशाद यांनी मुंबई गाठली

एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्णाच्या मृत्यूची सर्वांनाच प्रतिक्षा; यूपीच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितला दाहक अनुभव

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil criticize Narendra Modi for praising UP corona work

कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.