मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट आणि पंढरपूरवरही दावा केला. तेव्हापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर दोन्ही राज्यात प्रचंड गदारोळ माजला. त्यातच कर्नाटचे मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर कन्नडिगांनी हल्ला करत वाहनांची तोडफोड केली होती.