मुंबईची परिस्थिती बिकट, कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती

काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे. (Kumbh return to stay at quarantine compulsorily)

मुंबईची परिस्थिती बिकट, कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती
कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन करणार, किशोरी पेडणेकरांची माहिती
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 3:38 PM

मुंबई : हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले. (Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)

कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन

हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवलं जाणार आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.

सर्व सुविधा कमी पडू लागल्यात

मुंबईत परिस्थिती बिकट आहे. आता विनंती करुन झाली आहे. ऑक्सिजनचा तुटव़डा जाणवत आहे. त्यानंतर लगेच त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, हे दृश्य मुंबईकरांनी कधीच पाहिले नाही. आता सर्व सुविधा कमी पडू लागल्या आहेत. मी हात जोडून विनंती करते, कृपया घराबाहेर पडू नका, असेही महापौरांनी सांगितले.

तुम्हाला लॉकडाऊन हवाय का?

मुंबईकरांनो तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबईतील बेडची संख्या 19 हजारावरुन 25 हजार केले आहेत. तर 6 मोठे जम्बो सेंटर उभारले आहेत. मुंबईत जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुंबईत आता अमब्युलन्स आवाज वाढला आहे. तुम्हाला लॉकडाऊन हवाय का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला.

मुंबईतील ताजी आकडेवारी काय?

16 एप्रिल, संध्या 6:00 वाजता

24 तासात बाधित रुग्ण – 8,839

24 तासात बरे झालेले रुग्ण – 9033

बरे झालेले एकूण रुग्ण – 4,63,344

बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%

एकूण सक्रिय रुग्ण-85,226

दुप्पटीचा दर- 43 दिवस

कोविड वाढीचा दर (9 एप्रिल-15 एप्रिल)- 1.6%

(Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?

धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.