AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सारथी’ला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

'सारथी'ला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Uddhav ThackerayImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 11:35 AM
Share

गुरुवारी (26 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सारथी (Sarathi) संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्य शासनाने मराठी, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली. या संस्थेला खारघर सेक्टर 37 मधील तीन हजार 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर आणि मुंबई इथं विभागीय कार्यालय, वसतीगृहे, अभ्यासिका, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचं आणि 500 मुलींचं स्वतंत्र निवासी वसतिगृहदेखील विकसित करण्यात येईल. याअंतर्गत नवी मुंबई इथल्या केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरत रहा असं आवाहनही केलंय. राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के इतकी वाढ झाली आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे 18.52 टक्के आणि 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.

Follow Us
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.