AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 11 जिल्ह्यांवर लॉकडाऊनचं संकट?, कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 6 ते 7 हजार रुग्ण आढळत आहेत. ही स्थिती राज्याची चिंता वाढवणारी आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यांवर लॉकडाऊनचं संकट?, कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता
लॉकडाऊन प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 7:04 PM
Share

मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण 40 हजारांपेक्षा जास्त संख्येने आढळून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 6 ते 7 हजार रुग्ण आढळत आहेत. ही स्थिती राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकार काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याबाबत विचार सुरू असल्याचं कळतंय. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. महाराष्ट्राला देखील केंद्रानं सूचना दिल्या आहेत.

राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अधिक रुग्ण

महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या 6 ते 7 हजारांच्या दरम्यान

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी सहा ते सात हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यातील एखादी चूक देखील मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकते. राज्यात येत्या काळात एका दिवसात दहा हजार रुग्ण देखील आढळू शकतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी राज्यात किती रुग्ण आढळले?

महाराष्ट्रात रविवारी 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 157 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. रविवारी 4110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना मुक्त होण्याचा दर 96.59 वर पोहोचला आहे.

त्या अकरा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण किती?

पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.

इतर बातम्या:

Maharashtra HSC Result 2021 Date : बारावीच्या निकालाची तारीख ठरली, उद्या दुपारी 4 वाजता निकाल जाहीर होणार

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Maharashtra Corona Update state government may be declare strict lockdown in 11 district as per center guidelines

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.