AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड तुरुंगात रवानगी होणार?

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. (Maharashtra former home minister anil deshmukh sent in judicial custody till 19th november)

अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; आर्थर रोड तुरुंगात रवानगी होणार?
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 4:18 PM
Share

मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची रवानगी ऑर्थर रोड किंवा इतर तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना आत पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीच्या वतीने अॅड. अनिल सिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. अनिल देशमुख यांच्या वकिलांनीही जामीन का मिळावा याबाबतचा युक्तिवाद केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून देशमुख यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता देशमुख हे ईडीच्या कोठडीत न राहता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे. त्यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवणार की इतर तुरुंगात पाठवणार हे अद्याप समजू शकले नाही.

जामिनासाठी अर्ज करणार?

देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांचे वकील आज किंवा उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. देशमुख यांना जामीन मिळण्यासाठी त्यांच्या आरोग्याचं कारण आणि सर्वोच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवालाही दिला जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या:

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार

अहमदनगर शासकीय रुग्णालयातील आगीच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार?

पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा; चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले

(Maharashtra former home minister anil deshmukh sent in judicial custody till 19th november)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.