Mumbai Rains Updates | चिक्कार पाऊस, मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद

कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या शहरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. भिवंडीतही तसाच पाऊस कोसळतोय. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर खूप मोठा परिणाम पडलाय.

Mumbai Rains Updates | चिक्कार पाऊस, मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद
Rain Update : बदलापूर अंबरनाथमधील रेल्वे रुळ पाण्याखाली, नेमकी काय स्थिती आहे जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 4:47 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : राज्यात हवा तसा पाऊस आतापर्यंत पडलेला नाही, अशी तक्रार कालपर्यंत सर्वजण करत होते. पण आज पावसाने राज्यभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पाऊस प्रचंड कोसळतोय. राज्यातील अनेक नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे वाहतूक कोंडी होतेय. कोकणात परशुराम घाटत तर दरड कोसळली आहे. याशिवाय कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी सारख्या ठाणे जिल्ह्यातील शहरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे, इतका प्रचंड पाऊस तिथे कोसळतोय. पावसामुळे रेल्वे सेवेवर प्रचंड मोठा परिणाम पडला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवाशी परत रेल्वे स्थानकातून बाहेर परतताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात आज जिकडेतिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा उभ्या आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल, याबाबत काहीच निश्चित अशी माहिती नाही. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेखाली उतरून रेल्वे रुळाच्या मार्गाने आपल्या घरी निघाले आहेत.

कल्याण-कसारा रेल्वे वाहतूकही विस्कळीत

विशेष म्हणजे कल्याण-कसारा मार्गावरील लोकल वाहतूकदेखील बंद पडली आहे. कल्याण स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीय. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांवर गाड्या उभ्या आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकांजवळ एकामागे एक अशा अनेक गाड्या उभ्या आहेत. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेला जाणारी वाहतूकही प्रचंड संत गतीने सुरु आहे.

अंबरनाथ-बदलापूरहून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक बंद

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर प्रचंड पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. पाऊस बंद झाल्यानंतर पाणी ओसरल्यावर ही वाहतूक पूर्वरत होण्याची शक्यता आहे. पण वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांचे तुफान हाल होत आहेत. अनेकजण आता मुंबईहून कल्याणच्या दिशेला यायला निघत असतील. त्यामुळे पाऊस असाच सुरु राहिला तर या प्रवाशांपुढील आव्हानं वाढण्याची भीती आहे.

सीएसएमटी ते डोंबिवली रेल्वे सेवा सुरु

पावसामुळे आता कल्याण-डोंबिवली वाहतूकही ठप्प झाली आहे. तसेच सध्या तरी सीएसएमटी ते डोंबिवली अशी वाहतूक सुरु आहे. पण त्यापुढील वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.