AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray MNS Manifesto: 2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही…राज ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीचा केला उल्लेख

Raj Thackeray MNS Manifesto: मनसेच्या जाहिरनाम्यात पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान  दिला आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Raj Thackeray MNS Manifesto: 2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीचा केला उल्लेख
Raj Thackeray
| Updated on: Nov 15, 2024 | 12:28 PM
Share

Raj Thackeray MNS Manifesto: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा फक्त जाहीरनामा नाही तर त्यात केलेल्या घोषणा कशा पद्धतीने पूर्ण करणार? हे सुद्धा दिले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटबाबत कोणी विचारले नाही

अनेकांनी आम्ही काय करू एवढंच दिलं. आम्ही काय करू आणि कसं करू ते जाहीरनाम्यात टाकलं आहे. मी २००६ रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी टाकल्या आहेत. कारण विषय आणि प्रश्न बदलले नाही. त्यामुळे हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.

राज ठाकरे म्हणाले की, आता जाहीरनाम प्रसिद्ध करताना आमच्या अनेक लोकांना मी येथे बोलावले नाही. कारण ते मतदारसंघात प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना त्रास दिला नाही.

कसा आहे जाहिरनामा

जाहिरनाम्यात पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान  दिला आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेनेच आपण जाहीरनामा ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे केले. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असे जाहीरनाम्याची अंमलबजावणीसंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे

  1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
  2. दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
  3. सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
  4. राज्याची औद्योगिक प्रगती
  5.  मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
  6. गडकिल्ले संवर्धन
  7. कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
  8. राज्याचे करत धोरण सुधारणार
  9. डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
  10. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....