AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Traffic Jam : अचानक काय घडलं? दादर ते सायन दरम्यान तीन तासांपासून वाहतूक खोळंबा; 4 किलोमीटरपर्यंत…

मुंबईकरांची आज सकाळी सकाळीच चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. दादर ते सायन दरम्यान वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाणं अशक्य झालं आहे. परिणामी चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत.

Traffic Jam : अचानक काय घडलं? दादर ते सायन दरम्यान तीन तासांपासून वाहतूक खोळंबा; 4 किलोमीटरपर्यंत...
Massive traffic jam Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2023 | 11:05 AM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : मुंबईकरांसाठी आजची सकाळ अत्यंत त्रासदायक ठरली आहे. दादर ते सायन दरम्यान गेल्या तीन तासांपासून वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली आहे. चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गाडी पुढे जायलाच तयार नाहीये. त्यामुळे कामावर जाणारे चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत. तीन तासांपासून त्यांना गाडीत बसून राहावे लागले आहे. त्यातच उन्हाच्या झळा बसत असल्याने मुंबईकर चांगलेच वैतागले असून संताप व्यक्त करत आहेत.

माटुंगा किंग सर्कल पुलाच्याखाली एक भला मोठा सिमेंट, रेती वाहणारा डंपर डिव्हायडरला येऊन धडकला. डंपरचा अपघात झाला असून या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनरला गंभीर मार लागला आहे. त्यामुळे त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघांवर उपचार सुरू आहेत. मात्र, डंपर रस्त्यावरमध्येच अडकून पडला आहे. तीन तास झाले तरी हा डंपर हटवण्यात आला नाही. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पाहावं तिकडे वाहनेच वाहने

सकाळी 8 वाजल्यापासून दादरकडून सायनच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. तीन तासांपासून अडकलेला हा डंपर हटवण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आलं आहे. तीन तासांपासून डंपर हटवण्याचंच काम सुरू आहे. त्यामुळे या दादर ते सायन दरम्यान चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. दादर, सायन, माटुंगा हा संपूर्ण परिसर वाहनांनी गजबजून गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चाकरमानी गाडीतच अडकून पडले आहेत.

मात्र, गाडी काही जागची हलत नाहीये. कुणाला कामावर जायचे आहे, कुणाला शाळेत, कुणाला कॉलेजात तर कुणाला हॉस्पिटलला जायचे आहे. पण वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यातच उन्हाच्या प्रचंड झळा बसत असून अनेकजण घामाघूम झाले आहेत. सकाळचा नाश्ताही करता आला नसल्याने अनेकजण वैतागले आहेत.

रस्ता क्रॉस करणंही अशक्य

दादरपासून शाळेच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दोन किलोमीटरचा मार्ग क्रॉस करताना अर्धा तास लागत आहे. त्यामुळे पादचारीही वैतागले आहेत. हा डंपर कधी काढला जाईल असा सवाल केला जात आहे. डंपर कधी निघेल? अजून किती वेळ लागेल याची काहीच शाश्वती नाहीये. कुणीच त्याची माहिती देताना दिसत नाहीये. त्यामुळेही चाकरमानी भलतेच वैतागले आहेत. तर, वाहनांच्या एवढ्या रांगा लागल्यात की परत माघारी जाणंही शक्य नाहीये. त्यामुळे या वाहनचालकांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.