AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांचं डोकं आऊट झालय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला निशाणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना मी केली आहे. आणि ती तुलना करताना मी इतिहासातील संदर्भ दिले आहेत त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

ज्यांचं डोकं आऊट झालय, त्यांच्याबद्दल काय बोलणार; शिंदे गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला निशाणा
| Updated on: Feb 07, 2023 | 12:03 AM
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला. मात्र त्यावर आता विरोधकांनी जितेंद्र आव्हाड अशी विधानं जाणीपूर्वक करतात अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आमदार गुलाबराव पाटील यांनी टीका करताना जितेंद्र आव्हाड ज्यांचं डोकं आऊट झालय त्यांच्याबद्दल काय बोलणार असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप बरोबरच शिंदे गटातील नेत्यांकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील नेते “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या अराजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आणि वास्तव माहिती सांगण्यासाठी कार्यक्रम करत आहेत.

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वाक्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या इतिहासातील दिलेल्या संदर्भावर त्यांनी केलेली वक्तव्याबाबत विरोधकांकडून त्याच्या वर टीका केली जात आहे. त्यामुळे आता हा वाद आता वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना त्यांनी औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या इतिहासाबद्दल सांगताना त्यांनी तुलना केली. त्यामुळे भाजपकडून त्यावर वाद घालण्यात येत आहे.

शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे डोकं आऊट झाल्याचे सांगत त्यांच्यावर घणाघात केला आहे.

भाजप आणि आता शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्या बद्दल वाद घालण्यात येत असला तरी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना मी केली आहे. आणि ती तुलना करताना मी इतिहासातील संदर्भ दिले आहेत त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगतान औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या कट्टर विरोधकांबरोबर लढताना त्यांनी कोणत्या पद्धतीने आपला लढा उभा राहिल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र यावर आता भाजपबरोबरच शिंदे गटातील नेतेही वाद उखरून काढत आहेत. त्यामुळे टीव्ही नाईनशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मी सांगितला आहे तो इतिहास सांगितला आहे. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....