AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई बोट दुर्घटनेत दोन जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु, गेट वे इंडिया परिसरात सद्यस्थिती काय?

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ नीलकमल नावाची प्रवासी बोट बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय नौदलाच्या जलद गतीच्या बोटीने नीलकमलला धडक दिल्याने हा अपघात झाला. सध्या बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे आणि मृतांची संख्या वाढू शकते.

मुंबई बोट दुर्घटनेत दोन जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु, गेट वे इंडिया परिसरात सद्यस्थिती काय?
| Updated on: Dec 19, 2024 | 10:20 AM
Share

Mumbai Boat Accident : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया जवळून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेतील मृतांचा संख्या आता १३ वर पोहोचली आहे. यात तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेत 101 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तर अद्याप काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता गेट वे ऑफ इंडियाजवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गेट वे ऑफ इंडियाजवळ सध्याची परिस्थिती काय याचीही माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या नीलकमल या प्रवाशी बोटीला भारतीय नौदल (Indian Navy) च्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला. यानंतर ती बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. ही धडक इतर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली. बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातावेळी बोटीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रवासी होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून रेस्क्यू मोहीम सुरु

आता सध्या गेट वे ऑफ इंडियाजवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. काल रात्री अंधार असल्याने काही वेळ शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आता आज पहाटेपासून पुन्हा पोलिसांनी रेस्क्यू मोहीम सुरु केली आहे. सध्या पोलिसांची रेस्क्यू टीम समुद्रात बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे. अनेक पोलीस स्पीड बोट घेऊन तैनात झाले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी गेट ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून ही स्पीड बोट घेऊन समुद्रात शोध मोहीमेसाठी जात आहे.

नीलकमल बोट दुर्घटनेतील दोन प्रवाशी अद्यापही बेपत्ता आहेत. यात ७ वर्षीय जोहान निस्सार पठाण आणि ४३ वर्षीय हंसराज भाटी हे दोघे बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समुद्रात मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोघं अत्यवस्थ आहेत. या अपघातात नेव्हीच्या अधिकाऱ्यांसह एकूण तीन कर्मचारी देखील दगावले.

लाईफ जॅकेटचा खच वाढला

या बोट दुर्घटनेनंतर गेटवे ऑफ इंडिया वर लाईफ जॅकेटचा खच वाढला आहे. दुर्घटनेनंतर सुरक्षेसाठी राखीव ठेवलेल्या लाईफ जॅकेट्स पुन्हा बाहेर काढत प्रवाशांना लाईफ जॅकेटची सक्ती केली जात आहे. बोट चालकांनी आज काळजी घेणारी जी पद्धत सुरू केली आहे, ती यापुढे देखील कायम ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तर काही प्रवासी फोटो काढण्यासाठी लाईफ जॅकेट घालत नसल्याचे बोटवरील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र लाईफ जॅकेटच्या वापरावर यापुढे अधिक नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त केली जात आहे.

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...