AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai High Court : गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांचे धाबे दणाणले; दोनपेक्षा अधिक मुले? मग गृहनिर्माण संस्था समितीचा सदस्य पद विसरा, मुंबई हायकोर्टाचा निकाल काय

Housing Society Member : गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्या सदस्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. काय आहे उच्च न्यायालयाचा निकाल?

Mumbai High Court : गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांचे धाबे दणाणले; दोनपेक्षा अधिक मुले? मग गृहनिर्माण संस्था समितीचा सदस्य पद विसरा, मुंबई हायकोर्टाचा निकाल काय
मुंबई हायकोर्टात याचिका, राज्य सरकारची काय भूमिका
| Updated on: Jun 22, 2024 | 11:59 AM
Share

राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांचे धाबे दणाणले आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सदस्यांसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या एका निकालाने राज्यभरातील गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना मुंबई उच्च् न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कांदिवलीतील एकता नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेसंबंधीची ही याचिका होती.  काय आहे हा निकाल, काय होतील त्याचे परिणाम?

हायकोर्टाचा निकाल काय?

दोनपेक्षा जास्त मुले असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेचा समिती सदस्य म्हणून अपात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दोनपेक्षा जास्त अपत्य असलेली व्यक्ती गृहनिर्माण संस्थेची समिती सदस्य होऊ शकत नाही, असा असे हायकोर्टाने निकालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी दाखल याचिकेत दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याच्या कारणास्तव एकाला गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचा सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे.

कायद्यातच आहे तरतूद

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा राज्यात अस्तित्वात आहे. या कायद्याच्या कलम ७३ सी मध्ये, एखाद्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचा सदस्य होण्यासाठी अपात्र ठरविण्यासाठीचे नियम देण्यात आले आहे. त्यात अपत्यासंबंधी अपात्र ठरवले जाणारे कारण नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार, दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला गृहनिर्माण संस्थेच्या समितीचा सदस्य होता येणार नाही, असेही न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील छोट्या कुटुंबाच्या नियमानुसार याचिकाकर्त्याला अपात्र ठरवण्यात आल्याचेही न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले आहे.

कोणी दाखल केली याचिका

कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात कांदिवली एकता नगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य पवनकुमार सिंग हे आहेत. त्यांना म्हाडाच्या उपनिबंधकांनी अपात्र ठरवले होते. हा निर्णय सहनिबंधकांनी कायम ठेवला. त्यानाराजीने सिंग यांनी हायकोर्टात दाद मागितली होती. त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. छोट्या कुटुंबाचा हा नियम राज्यभरातील गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना बंधनकारक असल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे.

Follow Us
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार