मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात

जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहे.

मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात
जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ काढलेला मोर्चा
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2025 | 10:04 AM

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात ‘मंदिर तुटा, हौसला नाही’, असे फलक होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली. रॅलीत स्थानिक सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी होणार आहे.

आरती करुन आंदोलनास सुरुवात

शनिवारी सकाळी ९.३० वाजता जैन समाजाकडून आंदोलन सुरु झाले. आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली. त्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे फलक घेऊन जैन समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे. मंदिर त्याच ठिकाणी हवे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंदोलनात भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग अलवाणी यांच्यासह इतर स्थानिक नेते सहभागी होणार आहे.

मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी

जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहे.

विले पार्ले भागातील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात 90 वर्ष जुने जैन मंदिर होते. हे मंदिर पाडण्यासाठी बीएमसीने नोटीस दिली होती. त्या विरोधात जैन समाज न्यायालयत गेला होता. कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत मंदिर पाडले, असा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे.

Follow Us