Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने

कल्याणहून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेला मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या उशिराने
मुंबई लोकल
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 8:58 AM

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर काही तांत्रिक कारणामुळे सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. त्यामुळे कल्याणहून  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेला मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. धुकं, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि तांत्रिक कारणांमुळे कसारा-कर्जतहून कल्याणकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी कसारा-कर्जतहून सीएसएमटी आणि कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे.

यामुळे कल्याण-सीएसएमटीकडे जाणारी स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मोठा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. कर्जत, कसारा, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण यांसह अनेक स्थानकावर पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिसमध्ये पोहोचतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.