AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या… मोठा निर्णय! मोनो रेल्वे तात्पुरती स्थगित, किती दिवस राहणार बंद?

2460 कोटी रुपये खर्च करत उभारण्यात आलेली देशातील पहिली मोनोरेल येत्या दोन दिवसात बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. आता मोनोरेल पुन्हा कधी सुरु होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

प्रवाशांनो, इकडे लक्ष द्या... मोठा निर्णय! मोनो रेल्वे तात्पुरती स्थगित, किती दिवस राहणार बंद?
MonorailImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 18, 2025 | 2:45 PM
Share

देशातील एकमेव मोनेरेल ही मुंबईत असून चेंबूर ते सात रस्ता या मार्गावर ती धावते. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अपघतांमुळे एमएमआरडीने मोनोरेल सेवा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. आता ही मोनोरेल सेवा नेमकी कधी बंद होणार? त्यामध्ये काय बदल होणार आहेत चला जाणून घेऊया त्याविषयी…

मोनोरेलची तांत्रिक प्रणाली अपग्रेडेशन आणि भविष्यातील कार्यक्षमतेसाठी एमएमआरडीएने हे मोठे पाऊल उचलले आहे. येत्या २० सप्टेंबरपासून म्हणजे येत्या २ दिवसात मोनो सेवा स्थगित केली जाणार आहे. स्थगिती काळात काही परिक्षणं, सुरक्षेकरता नवी प्रणाली, आधुनिकीकरण यावर काम करण्यात येणार आहे. मात्र, मोनोरेल सेवा किती महिन्यांसाठी बंद राहणार आहे याबाबत कोणीतीही माहिती समोर आलेली नाही.

वाचा: चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने खरोखरच ॲसिडिटीची समस्या कमी होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

मोनोरेल सेवा का थांबवली जात आहे?

दररोज सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० पर्यंत मोनोरेल सेवा चालू असतात. केवळ 3.5 तासच रात्री ही सेवा बंद असते. एवढा मोठ्या कामासाठी हा वेळ खूपच कमी आहे. सेफ्टी प्रोटोकॉलनुसार पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज करणे व पुन्हा रिचार्ज करणे ही कामे या कालावधीत करणे अवघड होते. तसेच नवीन रेक्स आणि सिग्नलिंग सिस्टीमच्या स्थापनेसाठी अखंडित वेळ हवा आहे आणि जुन्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करून त्यांना नव्या सारखे बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे मोनोरेल सेवा काही महिन्यांसाठी बंद करण्यात ठेवण्यात येणार आहे.

कोणत्या महत्त्वाच्या सुधारणा होणार?

-नवीन ‘रोलिंग स्टॉक’ प्रगत CBTC सिग्नलिंग प्रणाली मोनोरेलमध्ये बसवण्यात येणार आहेत

-अत्याधुनिक CBTC (Communication-Based Train Control) प्रणालीचा समावेश मोनोरेलमध्ये केला जाणार आहे

-5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग-32 ठिकाणी बसवण्यात आले असून चाचणी सुरू आहे

-260 नवे Wi-Fi ॲक्सेस पॉइंट्स, 500 RFID टॅग्स, 90 ट्रेन डिटेक्शन युनिट्स आणि अनेक WATC युनिट्स आधीच बसवले गेले आहेत

-वे साइड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले असून एकात्मिक चाचणी सुरू आहे

नव्या गाड्या धावणार

-8 रेक्स मुंबईत पोहोचले आहेत

-9वा रेक तपासणीसाठी सज्ज आहे

-10 वा रेक तयार करण्याचे काम सुरू आहे

2460 कोटी रुपये खर्च करत देशातील पहिली मोनोरेल उभारण्यात आली. एका मोनोरेल गाडीची प्रवासी संख्या 562 आहे. संपूर्ण भारतातील एकमेव असलेल्या मोनोरेलवर नादुरुस्त गाड्यांमुळे अलिकडे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्यामुळे एमएमआरडीएने चौकशी समितीही नेमली आहे. 20 सप्टेंबर रोजी बंद होणारी मोनोरेल पुन्हा कधी सुरु होणार याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.