AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय.

मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 31, 2023 | 11:04 AM
Share

कृष्णा सोनरवाडकर, मुंबई | छत्रपती संभाजीनगरात (Sambhajianagar) बुधवारी रात्री घडलेल्या राड्या नंतर मुंबईतील (Mumbai) मालवणी (Malwani) येथे गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हा तणाव निर्माण झाला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना येथे लाठीचार्जही करावा लागला. आज शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रात्री नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा जात होती. या वेळी दोन गटात काही कारणांवरून वाद झाले आणि परस्परांना हाणामारी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी लाठीमारही केला. त्यानंतर येथील तणाव निवळला. मात्र सदर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

भाजपच्या सरकारमध्ये दंगे- राऊत

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रासह सर्व देशात रामनवमी निमित्त दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी तो यशस्वी झाला तर काही ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दंगल होऊ द्यायची नाही असे लोकांनी ठरवले होते. पण संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची 2 तारखेला सभा आहे. ती सभा होऊ द्यायची नाही. कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारायची वातावरण खराब आहे तणावपूर्वक आहे असे सांगायचे, असा सरकारचा डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रा झाल्या. गुडीपाडव्याच्या शोभायात्रा झाल्या. मालवणीत पण असाच प्रकर झाला. खासकरून खेड मालेगावातूल सभांना जो प्रतिसाद मिळाला आहे तो पाहाता काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यानंतर काही लोक हाताशी धरून वातावरण खराब करायचे, तेढ निर्माण करायची, असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळेच सरकारला नपूंसक म्हटले जात आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....