AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय.

मोठी बातमी | मालवणी राडा प्रकरणी 25 जणांना अटक, तणावपूर्ण शांतता, रामनवमीला काल काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 31, 2023 | 11:04 AM
Share

कृष्णा सोनरवाडकर, मुंबई | छत्रपती संभाजीनगरात (Sambhajianagar) बुधवारी रात्री घडलेल्या राड्या नंतर मुंबईतील (Mumbai) मालवणी (Malwani) येथे गुरुवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली. दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान हा तणाव निर्माण झाला. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना येथे लाठीचार्जही करावा लागला. आज शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे तर आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

रात्री नेमकं काय घडलं?

मुंबईतील मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा जात होती. या वेळी दोन गटात काही कारणांवरून वाद झाले आणि परस्परांना हाणामारी सुरु झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगण्यासाठी लाठीमारही केला. त्यानंतर येथील तणाव निवळला. मात्र सदर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

भाजपच्या सरकारमध्ये दंगे- राऊत

काल संभाजीनगरात झालेल्या राड्यानंतर आज मुंबईतदेखील दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. यावरून संजय राऊत यांनी भाजप-शिंदे सरकारला दोषी धरलंय. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ महाराष्ट्रासह सर्व देशात रामनवमी निमित्त दंगली घडवण्याचा प्रयत्न केला गेला. काही ठिकाणी तो यशस्वी झाला तर काही ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दंगल होऊ द्यायची नाही असे लोकांनी ठरवले होते. पण संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची 2 तारखेला सभा आहे. ती सभा होऊ द्यायची नाही. कायदा सुव्यवस्थेचे कारण देऊन परवानगी नाकारायची वातावरण खराब आहे तणावपूर्वक आहे असे सांगायचे, असा सरकारचा डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय.

यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रा झाल्या. गुडीपाडव्याच्या शोभायात्रा झाल्या. मालवणीत पण असाच प्रकर झाला. खासकरून खेड मालेगावातूल सभांना जो प्रतिसाद मिळाला आहे तो पाहाता काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यानंतर काही लोक हाताशी धरून वातावरण खराब करायचे, तेढ निर्माण करायची, असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळेच सरकारला नपूंसक म्हटले जात आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?