AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai water cut : मुंबईत आजपासून 10% पाणीकपात! मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन

Mumbai Water Cut from today : पुढचे 35 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे.

Mumbai water cut : मुंबईत आजपासून 10% पाणीकपात! मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
पाण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट...Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 27, 2022 | 6:33 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai water cut news) महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आजपासून (27 जून) 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी (Water shortage) जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं धरणक्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मुंबईकरांना सतावू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागेल. आजपासून (27 जून) ही पााणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. आता मान्सूनचा पाऊस जरी दाखल झाला असला, तरिही, पुरेसा पाऊस (Monsoon Update) धरणक्षेत्रात झालेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. सात तलावांमध्ये दहा टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या तलावात किती पाणीसाठा?

  1. मोडकसागर 47078 दशलक्ष लिटर
  2. तानसा 7927 दशलक्ष लिटर
  3. मध्य वैतरणा 18013 दशलक्ष लिटर
  4. भातसा 62446 दशलक्ष लिटर
  5. विहार 3832 दशलक्ष लिटर
  6. तुलसा 2092 दशलक्ष लिटर

35 दिवस पुरेल इतकंच पाणी

पावसाने दडी मारल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये अवघा 9.77 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढचे 35 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पाण्याचं नियोजन करणं क्रमप्राप्त असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय. पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी बीएमसीने सोमवारपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतलाय.

पावसाची दडी

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यामधील 27 टक्के पाणी हे पाणी गळतीत वाया जातं. त्यामुळे बहुतांश भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अशातच जून महिना आता संपत आला आहे आणि मान्सून अजूनही म्हणावा तसा सक्रिय झालेला नाही. त्याचा परिणाम मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुवठ्यावर होतोय. त्यामुळे मुंबईकरांनाही पाण्याचा अपव्यय टाळून जपून पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!