AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही

Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा
पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा Image Credit source: tv9
| Updated on: Jun 09, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई – राज्यात यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच हवामान खात्याने वर्तविले होते. त्याचबरोबर मान्सून (Mansoon) वेळेआगोदर दाखल होऊल अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु हवामान खात्याचा (weather department) तो अंदाज चुकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यंदा पाऊस वेळेत दाखल झाला नसला तरी मुंबईकरांना चिंता करण्याचं काहीचं कारण नाही. कारण मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आणि तलावामध्ये जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. विशेष उन्हाळ्यात अनेकदा मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा मागच्या तीन वर्षापेक्षा पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. पुढचे 55 दिवस पाणी मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर – 46639 दशलक्ष लिटर

तानसा – 10859 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा – 44790 दशलक्ष लिटर

भातसा – 104210 दशलक्ष लिटर

विहार – 3645 दशलक्ष लिटर

तुलसी – 2319 दशलक्ष लिटर

27 टक्के पाण्याची गळती होते

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा करत असताना काही भागात पाण्याची गळती होत असल्याचे 27 टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. यंदा समाधानकारण पाणी शिल्लक असल्याने पाणी टंचाई करण्यात आलेली नाही.

४०० दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता येणं शक्य

मुंबईत पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी पालिकेकडून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. मनोरी येथील इस्रायली तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित खारे पाणी गोडे करणे प्रकल्पात सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर करण्याचं उद्दिष्ट आहे. तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता केलं जाणार आहे.

या प्रकल्पासाठी ऑगस्टपर्यंत जागतिक निविदा मागवण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.