AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही

Mumbaikar : पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा
पाऊस उशिरा आला तरी मुंबईकरांना पाण्याची चिंता नाही, जाणून किती शिल्लक आहे पाणीसाठा Image Credit source: tv9
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 09, 2022 | 8:15 AM
Share

मुंबई – राज्यात यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच हवामान खात्याने वर्तविले होते. त्याचबरोबर मान्सून (Mansoon) वेळेआगोदर दाखल होऊल अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु हवामान खात्याचा (weather department) तो अंदाज चुकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. यंदा पाऊस वेळेत दाखल झाला नसला तरी मुंबईकरांना चिंता करण्याचं काहीचं कारण नाही. कारण मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आणि तलावामध्ये जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे. विशेष उन्हाळ्यात अनेकदा मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. परंतु यंदा मागच्या तीन वर्षापेक्षा पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. पुढचे 55 दिवस पाणी मुंबईकरांना पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर – 46639 दशलक्ष लिटर

तानसा – 10859 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा – 44790 दशलक्ष लिटर

भातसा – 104210 दशलक्ष लिटर

विहार – 3645 दशलक्ष लिटर

तुलसी – 2319 दशलक्ष लिटर

27 टक्के पाण्याची गळती होते

मान्सूनच्या अनिश्चितपणामुळे मे आणि जून महिन्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागायचा. परंतु गेल्यावर्षी समाधानकारक राज्यात पाऊस झाल्याने यंदा पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या धरणांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा करत असताना काही भागात पाण्याची गळती होत असल्याचे 27 टक्के पाण्याची गळती होते. त्यामुळे काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. यंदा समाधानकारण पाणी शिल्लक असल्याने पाणी टंचाई करण्यात आलेली नाही.

४०० दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता येणं शक्य

मुंबईत पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यासाठी पालिकेकडून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. मनोरी येथील इस्रायली तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित खारे पाणी गोडे करणे प्रकल्पात सुरुवातीला 200 दशलक्ष लिटर करण्याचं उद्दिष्ट आहे. तर प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर दररोज 400 दशलक्ष लिटरपर्यंत पाणी गोड करता केलं जाणार आहे.

या प्रकल्पासाठी ऑगस्टपर्यंत जागतिक निविदा मागवण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा