AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो, ठाण्यातून सुषमा अंधारे यांच्यावर कुणाची टीका?

दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, अशी टीका सुषमा अंधारे यांच्यावर करण्यात आली.

बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो, ठाण्यातून सुषमा अंधारे यांच्यावर कुणाची टीका?
नरेश म्हस्के Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2022 | 8:37 AM
Share

ठाणेः बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो. त्याला अर्थ, निष्ठा, बांधिलकी, विचार यांच्याशी संबंध नसते, असे या बाईचे झाले आहे, अशी थेट टीका सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ही घणाघाती टीका केली आहे. ठाण्यात त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

नरेश म्हस्के म्हणाले, कालपर्यंत या बाई हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या.

काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात. दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं…

सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचा मुंबईतच्या निवडणुकीत जीव अडकला आहे. उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. त्यांची मते मिळावी, यासाठी त्यांच्यात सहानुभूती निर्माण व्हावी, याकरिता बिहारचा दौरा आयोजित करण्यात आला असावा.

लालू प्रसाद यादव यांनी कायमच शिवसेनेला विरोध केला आहे. बाळासाहेबांच्या विरोधात ते कायमच बोलत आले आहेत. आता हीच लोकं ठाकरेंना जवळची वाटत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते. आता तर हे लोक स्वतःहून इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांना भेटत आहे, काय वेळ आली आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.