AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत…देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

mumbai coastal road: नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत...देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
mumbai coastal road
| Updated on: Nov 12, 2024 | 1:41 PM
Share

मुंबई आणि नवी मुंबई रस्ते मार्गाने प्रवास करणे मोठे दिव्यच असते. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. परंतु राज्यात समृद्धी महामार्ग साकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन भागांना जलदगतीने मार्गाने जोडण्याचा प्लॅन सांगितला. नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना सांगितले. ‘कोस्टल रोड’ चा विस्तार भयंदर, विरार पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जपान सरकार 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असे फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

काय म्हणाले फडणवीस

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे. नवीन रस्ते होत आहे. आता या ठिकाणी विमानतळ आले तर या भागाचे चित्र बदलणार आहे. या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी होणाऱ्या वाढवण बंदरामुळे कोळी बंधू समृद्ध होतील. नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळे कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.

मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यावर 15 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच शेती पंपासाठी बिल भरायची गरज राहणार नाही. त्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे. तसेच आपले सरकार आल्यावर पूर्ण कर्ज माफी करू, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

किती हुशार मुलगी असली तरी पैशांमुळे शिकवले गेले नाही. मात्र आता त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंत्रालयातील त्यांचा मामा करतील. महिलांना बसमधून अर्ध्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली. त्यामुळे तोट्यातील एसटी नफ्यात आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी काँग्रेससह अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले. परंतु त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांना लाभ दिला. परंतु हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करू पाहत आहेत. या योजने विरोधात ते कोर्टात गेले आहे. सरकार आता लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार आहे.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.