AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत…देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

mumbai coastal road: नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत...देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
mumbai coastal road
| Updated on: Nov 12, 2024 | 1:41 PM
Share

मुंबई आणि नवी मुंबई रस्ते मार्गाने प्रवास करणे मोठे दिव्यच असते. सध्या या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. परंतु राज्यात समृद्धी महामार्ग साकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन भागांना जलदगतीने मार्गाने जोडण्याचा प्लॅन सांगितला. नरीमन पॉईंट ते विरार प्रवास रस्ते मार्गाने केवळ ४० मिनिटांत होणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी नवी मुंबईतील प्रचार सभेत बोलताना सांगितले. ‘कोस्टल रोड’ चा विस्तार भयंदर, विरार पालघरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी जपान सरकार 40 हजार कोटी कर्ज देणार आहे, असे फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

काय म्हणाले फडणवीस

नरीमन पॉईंट ते विरार प्रवास ४० मिनिटांत करता येणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु होत आहे. त्यासाठी जपान सरकारकडून ५४ हजार कोटी मिळणार आहेत. तसेच नवी मुंबईत वाढवण बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे. नवीन रस्ते होत आहे. आता या ठिकाणी विमानतळ आले तर या भागाचे चित्र बदलणार आहे. या विमानतळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे जाहीर केले. या ठिकाणी होणाऱ्या वाढवण बंदरामुळे कोळी बंधू समृद्ध होतील. नरेंद्र मोदी यांनी निल क्रांती योजना आणली. त्यामुळे कोळी बांधवांना कर्ज मिळू लागले. मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात बदल होऊ लागले, असे फडणवीस यांनी सांगितले.

मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना शेतीचा दर्जा दिला. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यावर 15 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच शेती पंपासाठी बिल भरायची गरज राहणार नाही. त्यांचे वीज बिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे. तसेच आपले सरकार आल्यावर पूर्ण कर्ज माफी करू, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

किती हुशार मुलगी असली तरी पैशांमुळे शिकवले गेले नाही. मात्र आता त्यांच्या शिक्षणाचा खर्च मंत्रालयातील त्यांचा मामा करतील. महिलांना बसमधून अर्ध्या दरात प्रवास करण्याची सवलत दिली. त्यामुळे तोट्यातील एसटी नफ्यात आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी काँग्रेससह अनेकांनी आम्हाला वेड्यात काढले. परंतु त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांना लाभ दिला. परंतु हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करू पाहत आहेत. या योजने विरोधात ते कोर्टात गेले आहे. सरकार आता लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करणार आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.