AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या कन्येची सर्वात मोठी मागणी, शिंदे सरकार बळीराजासाठी सुप्रिया सुळे यांचं ऐकणार?

शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडे सर्वात मोठी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी सध्या राज्यातील परिस्थितीला धरुन अतिशय योग्यदेखील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार सुप्रिया सुळे यांची मागणी मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार यांच्या कन्येची सर्वात मोठी मागणी, शिंदे सरकार बळीराजासाठी सुप्रिया सुळे यांचं ऐकणार?
Sharad pawar-Supriya SuleImage Credit source: ANI
| Updated on: Aug 29, 2023 | 6:01 PM
Share

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार गंभीर नसल्याची टीका केली. राज्यात यावर्षी प्रचंड कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचे भाऊ उपमुख्यमंत्री अजित पवारही सत्तेत सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झालाय. हा संपूर्ण गट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणारा आहे. पण तरीही त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या गटामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. पक्षाचा एक भलामोठा गट सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या या मागणीला महत्त्व आहे. पण तरीही राज्य सरकार सुप्रिया सुळेंच्या मागणीला किती महत्त्व देतं हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

सुप्रिया सुळे यांचा सरकारवर गंभीर आरोप

“केंद्र सरकारच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप असतं. जे केंद्रात होतं तेच दुर्देवाने महाराष्ट्रात होत आहे, ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. हे जुमल्याचं सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन दिलं. पण दुप्पट सोडा, जे आहे ते देखील दिलं जात नाही. याउलट शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं जात आहे”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला.

सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मोठी मागणी

“मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. तातडीने राज्यात दुष्काळ झाला पाहिजे. जनावरांसाठी पुरेसा चारा नाही. शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करा आणि दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे”, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

‘हा कुठला न्याय?’

“मी सातत्याने तांदुळाबद्दल बोलत आहे. कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही आता बोलत आहात. मी गेल्या चार महिन्यांपासून बोलतेय. तुम्ही माझे ट्विट बघा. माझं आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत या विषयावर अनेक मतभेद झाले आहेत. मी सातत्याने पियूष गोयल यांना विनंती करत होते की, कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी द्या. पण त्यांनी त्याकाळात कांद्याला परवानगी दिली नाही. याउलट कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के टॅक्स लावण्याचा पाप या सरकारने केला. विशेष म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आणि हाय इनकमवाल्यांना 30 टक्क्याच्या आत टॅक्स आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला 40 टक्के टॅक्स लावला. हा कुठला न्याय आहे?”, असा सवाल सुळे यांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.