AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अमित शाह यांच्यासोबत भेटीची चर्चा, आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आज अचानक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील आणि अमित शाह यांच्या कथित भेटीची चर्चा रायकीय वर्तुळात रंगत असताना मुंबईत घडणाऱ्या या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झालंय.

आधी अमित शाह यांच्यासोबत भेटीची चर्चा, आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
| Updated on: Aug 07, 2023 | 6:54 PM
Share

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा दोन दिवसांपासून रंगलेली असताना आता मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यापैकी इंडिया आघाडीची आगामी काळात मुंबईत होणारी बैठक हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.

अमित शाह नुकतंच दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांची शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय जयंत पाटील यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा अचानक समोर आली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जयंत पाटील यांनी या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. आपण शरद पवार यांच्यासोबत असून अमित शाह यांच्या भेटीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. अमित शाह यांच्यासोबत आपल्या भेटीच्या जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली होती. तर अजित पवार यांनीदेखील जयंत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांचं खंडन केलं आहे. या चर्चांनंतर आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला का गेले?

देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील आहेत. या आघाडीची तिसरी आणि महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. याच बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया सध्या तरी दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.