“हे सरकार केवळ नाममात्र”;राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

| Updated on: Jan 29, 2023 | 8:58 PM

सरकार जेव्हा स्थापन झाल्यावर 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहत आहेत. योग्य ते निर्य होऊ शकत नाही.

हे सरकार केवळ नाममात्र;राष्ट्रवादीच्या नेत्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
Follow us on

मुंबईः लव्ह जिहादबद्दल राज्यात किंवा देशात जन आक्रोश मोर्चा काढला जातो आहे. लव्ह जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे परंतु काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणूक जवळ आल्या की, अस काहीतरी करतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाचे हे प्रयत्न असू शकतात अशीही टीका केली जाते आहे.

सध्याच सरकार अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर हे सरकार अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वय नसल्याची टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाहीत. तर सी सर्व्हे समोर आला आहे.

या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेत चांगल्या जागा म्हणजे चाळीस ते चौवेचाळीस जागा मिळतील असंही समोर आलं आहे. तर राज्यात ती सद्यपरिस्थिती आहे त्यावर आधिरीत असा हा सर्व्हे आहे.

सध्याच सरकार अस्थिर आहे, मात्र सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो? त्यावर सरकार अवलंबून आहे. हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यामध्ये समन्वय नाही.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडणे आणि सर्वांना एकत्र करणं हा खटाटोप करण्यात आला आहे अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.

राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांच कर्ज आहे.

सामान्य माणसाला याचा काही लाभ होत नाही म्हणून या सर्व्हेच्या माध्यमातून लोक या सरकारला मदत करणार नाही असंच दिसून येतं आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीमध्ये सामील होणार की नाही? याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की या युतीबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आला नाही किंवा तस बोलणंही झालं नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसा प्रस्ताव आला तर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकार जेव्हा स्थापन झाल्यावर 7 महिन्याचा कालावधी झाला. मात्र अद्यापि मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. 18 मंत्री कारभार या राज्याचा पाहत आहेत. योग्य ते निर्य होऊ शकत नाही.

जनसंपर्क कमी पडत आहे. सर्व आमदार शिंदे गटाचे आमदार मंत्रिमंडळात येण्यास इच्छूक आहे कोणाला घ्यावे हा पेच असल्यामुले विस्तार होत नाही.

एकदा विस्तार होऊ द्या, यातील असंतोष आपोआप उफाळून येईल, मला का डावलल या असंतोषाला तोंड देणे कठीण होईल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.