AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा गेल्या? नितेश राणेंचा बीएमसीला सवाल

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुरू झालेल्या बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्थांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा गेल्या? नितेश राणेंचा बीएमसीला सवाल
नितेश राणे, आमदार, भाजप
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुरू झालेल्या बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्थांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून या संस्था नियमfत आणि चांगलं काम करत होत्या.मग अचानक तोट्यात कशा गेल्या ?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

फायद्यात असणाऱ्या संस्था तोट्यात कशा गेल्या?

नितेश राणे यांनी बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्था नियमित आणि चांगलं काम करत होत्या, असं म्हटलंय. सर्व संस्था तोट्यात चालत असून खासगीकरणाशिवाय पर्याय नाही हा दावा कोणत्या कॅान्ट्रॅक्टर्सच्या फायद्यासाठी ?, असा सवाल राणे यांनी केला आहे.

इतकी वर्ष संस्थेच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवींच नेमकं काय झाल ? कुठे खर्च झाल्या याचा हिशोब द्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून खाजगी कॅान्ट्रॅक्टर्स भरती करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

कोरोना काळात उत्पन्नाचे स्त्रोत घटले

एप्रिल 2020 पासून कोरोनाच्या संकटामध्ये प्रतिष्ठनची दोन्ही क्रीडा संकुलातील सर्वच सुविधा पूर्णपणे गेली एक वर्ष बंद झालेली होती. त्यामुळे दोन्ही क्रीडा संकुलातील उत्पन्नाचे स्त्रोत संपूर्णपणे घटले आहेत. याकालावधी दरम्यान दोन्ही संकुलातील आवश्यक जागाही कोव्हिड-19 चे साहित्य ठेवण्याकरिता आणि मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्य, असं नितेश राणे म्हणाले.

एप्रिल 2020 पासून आजपर्यंत प्रतिष्ठानाच्या कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट दहा हजार रुपये मानधन वेतन म्हणून दिले जात आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी देखील एप्रिल 2020 पासून पूर्णपणे भरण्यात आलेला नाही व या कालावधीत सेवानिवृत झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांचे सेवानिवृत्ती नंतरचे देयक अनेकांना देण्यात आलेले नाही आणि ज्यांना देयक दिल्या जात आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने दिल्या जात आहेत याकडेही नितेश राणे यांनी लक्ष वेधलं आहे.

इतर बातम्या:

…अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं प्रकरण काय?

Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Nitesh Rane wrote letter to BMC Commissioner for raised questions about two institutions privatizations

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.