AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : फाटाफुटीची चिंता नाहीच, उद्या आपण जिंकणारच; विधान परिषद निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंचा निर्धार

CM Uddhav Thackeray : या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे.

CM Uddhav Thackeray : फाटाफुटीची चिंता नाहीच, उद्या आपण जिंकणारच; विधान परिषद निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंचा निर्धार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2022 | 2:16 PM
Share

मुंबई: उद्याच्या निवडणुकीची (MLC Election 2022) चिंता नाही. मी चिंता करत बसलो तर जे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमन्यात भिनवलं आहे, त्याचा उपयोग काय? हारजीत तर होतच असते. उद्या तर आपण जिंकणारच आहोत. उद्याचा तर प्रश्नच नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं. राज्यसभा निवडणुकीत आपलं एकही मत फुटलं नाही. फुटलं कोणतं? त्याचा अंदाज लागला आहे. कोणी काय काय कलाकारी केली तेही कळलं आहे. हळूहळू उलगडा होईल. उद्या फाटाफुटीची चिंता नाही. शिवसेनेते (shivsena) गद्दार मनाचा कोणी राहिला नाहीये. आपण फाटाफुटीचं राजकारण बघत आलो आहोत. कितीही फाटलं फुटलं तरी शिवसेना एक राहिलं आहे. हे आपण इतिहासाला दाखवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पवईच्या वेस्ट इन हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक, खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगलं चित्रं दिसलं पाहिजे. आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मोठी संख्या दिसत आहे. याच संख्येने येत्या विधानसभा निवडणुकीत आपले आमदार निवडून आले पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हे माझं हिंदु्त्व नाहीये

काही लोक हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत. ज्यावेळी कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हतं, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है ही विहिंपची घोषणा होती. पण ही घोषणा बोलायलाही कोणी तयार नव्हतं. हिंदुत्व बोलणं हा गुन्हा समजला जायचा. तेव्हा हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने बुलंद केला. आज जे काही चाललंय ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाहीये, अशी टीका त्यांनी भाजपचं नाव न घेता केली.

तरुणांची माथी कोणी भडकवली?

अग्निपथ विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. का भडकली त्यांची माथी? कोणी भडकवली त्यांची माथी? म्हणून मी आपल्यासभेत बोललो होतो हृदयात राम आणि हाताला काम हवं. आज हेच चित्रं देशात दिसतंय. हृदयात राम आहेच. पण प्रत्येकाला दाखवता येणार नाही. हाताला काम नसेल तर राम राम म्हणून काही उपयोग नाही. सुरुवातीला नोटाबंदी झाली. लोकांमध्ये भय होतं. हुं की चू केलं नाही. निर्णय पचून गेला. शेतकरी कायदे आले. तेव्हा शेतकऱ्यांनी ऐकलं नाही. हटून बसले. मग नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागंल. आज नवं टुमणं काढलं. वचनं अशी द्या की ती पूर्ण झाली पाहिजे. शिवसेनेने जे जे वचन दिलं ते पूर्ण केलं. दोन कोटी नोकऱ्या देऊ, पाच वर्षात नोकऱ्या देऊ… काहीच दिलं नाही. एखादी योजना आणायची अग्निवीर, अग्निपथ योजना. शिकवणार काय तर सुतार काम. गाडी चालवायला शिकवणार. रंधा मारायला शिकवणार पण नाव अग्निवीर, अशी टीका त्यांनी केली.

सैन्य भाडोत्री, हा काय प्रकार?

चार वर्षासाठी सरकार नोकरी देणार आहे. नंतर नोकरीचा पत्ता नाही. ऐन उमेदवारीच्या वयात शिक्षण नाही. मृगजळ दाखवलं जात आहे. लाखोंनी मुलं आली तर नेमकी किती मुलं कामाला येणार? सर्वात भयानक प्रकार म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? असं असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणू. टेंडर काढा. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आमदार पाहिजे, पंतप्रधान पाहिजे. काढा टेंडर. नाही तरी पाच वर्ष आमचं भाडोत्रीच काम आहे. पाच वर्षानंतर एक्स्टेन्शनसाठी लोकांकडे जावं लागतो. एल-1 असेल तर येईल. मध्यावधी आल्यातर आयटम रिओपन होणार. भाडोत्रीच प्रकार असेल तर सर्वच भाडोत्री ठेवा ना. उगाच काही तरी स्वप्न दाखवायची. तर लोक भडकणार नाही तर काय? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ