AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लढाईला मजा येते”; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं…

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली

लढाईला मजा येते; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं...
| Updated on: Mar 01, 2023 | 12:43 AM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी आणि बाजीप्रभू हे शेवटपर्यंत लढत होते. त्यांच्यासारख्या सैनिकांप्रमाणे आपल्यालाही लढाई करायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढा हा चालूच राहणार असल्याने त्यासाठी आपली संघटना मजबूत करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शिवगर्जना यात्रे प्रसंगी ते बोलत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी गटातील ठाकरे गटाची राज्यातील वेगवेगळ्या भागात शिवगर्जना यात्रा जोरदारपणे सुरु आहे. त्यामुळे शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ठाकरेगटातील नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी राज्यातील महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. शेतीमालाा योग्य भाव मिळत नसल्याने शेतीमालावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरं सोडून पीक जनावरांच्या स्वाधीन केले आहे.

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पण त्याचवेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आवाहन करताना येणाऱ्या काळात आपली ही संघटना आणखी मजबूत होईल आणि ती कशी करता येईल याकडे लक्ष द्या असं आवाहन त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना केले आहे.

येणाऱ्या काळात लढई मोठी करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांना उद्देश्यून ते म्हणाले की, एकदा हा लढा जिंका, कारण आता लढाईला खरी मजा येते असल्याचे सांगत येणाऱ्या काळात लढा मजबूत करा आणि संघटनाही मजबूत करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.