AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“लढाईला मजा येते”; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं…

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली

लढाईला मजा येते; ठाकरे गटाच्या नेत्यानं कार्यकर्त्यांना बळ दिलं, अन् शिवसेनेला सुनावलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 01, 2023 | 12:43 AM
Share

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तानाजी आणि बाजीप्रभू हे शेवटपर्यंत लढत होते. त्यांच्यासारख्या सैनिकांप्रमाणे आपल्यालाही लढाई करायची आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढा हा चालूच राहणार असल्याने त्यासाठी आपली संघटना मजबूत करा असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. शिवगर्जना यात्रे प्रसंगी ते बोलत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्देश्यून भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरही जोरदार हल्लाबोल केला.

राज्यात एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे विरोधी गटातील ठाकरे गटाची राज्यातील वेगवेगळ्या भागात शिवगर्जना यात्रा जोरदारपणे सुरु आहे. त्यामुळे शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने ठाकरेगटातील नेत्यांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी राज्यातील महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भावही मिळत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे. शेतीमालाा योग्य भाव मिळत नसल्याने शेतीमालावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरं सोडून पीक जनावरांच्या स्वाधीन केले आहे.

सध्याच्या काळात शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पण त्याचवेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आवाहन करताना येणाऱ्या काळात आपली ही संघटना आणखी मजबूत होईल आणि ती कशी करता येईल याकडे लक्ष द्या असं आवाहन त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना केले आहे.

येणाऱ्या काळात लढई मोठी करावी लागणार आहे. कार्यकर्त्यांना उद्देश्यून ते म्हणाले की, एकदा हा लढा जिंका, कारण आता लढाईला खरी मजा येते असल्याचे सांगत येणाऱ्या काळात लढा मजबूत करा आणि संघटनाही मजबूत करा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!