AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन

तिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन
अजित पवार (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jul 07, 2022 | 3:41 PM
Share

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर आहेत. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी या सूचना केल्या आहेत.

‘तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी’

जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत 65 जणांचा बळी

राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत धोकादायक ठिकाणांवरून 4500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत राज्यभरात पावसाने 65 जणांचा बळी घेतला आहे, तर या मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 57हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोकणातील परिस्थितीदेखील गंभीर रूप धारण करत आहे. येथील नद्यांना पूर आल्याने जनजीवन ठप्प होत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच