AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन

तिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra rain : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करावं, अजित पवारांचं आवाहन
अजित पवार (संपादित छायाचित्र)Image Credit source: Twitter
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jul 07, 2022 | 3:41 PM
Share

मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा हे जिल्हे 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर आहेत. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी या सूचना केल्या आहेत.

‘तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी’

जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत 65 जणांचा बळी

राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत धोकादायक ठिकाणांवरून 4500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत राज्यभरात पावसाने 65 जणांचा बळी घेतला आहे, तर या मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 57हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोकणातील परिस्थितीदेखील गंभीर रूप धारण करत आहे. येथील नद्यांना पूर आल्याने जनजीवन ठप्प होत आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड