AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC local: एका बाजूला विरोध, दुसरीकडे प्रवाशांच्या संख्येत इतक्या पटींनी वाढ, मध्य रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद?

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना एसी लोकलमुळे सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येते आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी-2022 मधील दैनंदिन सरासरी 5,939 प्रवाशांवरून ऑगस्ट-2022 मध्ये 41,333 प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास 7 पटीने ही संख्या वाढली आहे.

AC local: एका बाजूला विरोध, दुसरीकडे प्रवाशांच्या संख्येत इतक्या पटींनी वाढ, मध्य रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद?
एसी लोकलImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 03, 2022 | 4:41 PM
Share

मुंबई – मुंबईच्या उपनगरीय रेल्वे (Mumbai local)म्हणजे लोकल या मुंबईच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जातात. दररोज लाखो नागरिक या लोकलमधून मुंबईत आणि मुंबईतून परत उपनगरांत प्रवास करीत असतात. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर काही महिन्यांपूर्वी एसी लोकल (Air condition local)सुरु करण्यात आल्या. त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, या लोकलच्या विरोधात उद्रेकही पाहायला मिळतो आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसटीवरुन सुरु झालेल्या एसी लोकलला विरोध करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशनवर तीन वेळा प्रवाशांनी आंदोलन केले. त्यानंतर गर्दीच्या वेळी या लोकल बंद करण्यात आल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Avhad)यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिवा, मुंब्रा, कळवा या रेल्वे स्टेशनवर होत असलेल्या वाढत्या गर्दीत एसी लोकलची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या एसी लोकलची गरज आहे का, याचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. प्रत्यक्षात मात्र मध्य रेल्वेवरील एसी लोकलला गेल्या सहा-सात महिन्यांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

एसी लोकल प्रवाशी संख्येत सात पटींनी वाढ

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाशांना एसी लोकलमुळे सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात येते आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी-2022 मधील दैनंदिन सरासरी 5,939 प्रवाशांवरून ऑगस्ट-2022 मध्ये 41,333 प्रवासी इतकी वाढली आहे. म्हणजेच, जवळपास 7 पटीने ही संख्या वाढली आहे.

ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही एसी लोकलची टॉप 3 स्टेशन

सध्या, मध्य रेल्वे 56 वातानुकूलित लोकलसह एकूण 1810 उपनगरीय सेवा चालवते. एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. प्रवाशी संख्येत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही टॉप 3 स्टेशने असल्याचेही सांगण्यात येते आहे.

फेब्रुवारी 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वातानुकूलित लोकलच्या प्रवासांची संख्या- टॉप 3 स्थानके ठाणे-10,50,511 डोंबिवली-9,39,431 आणि कल्याण-9,01,859 इतकी आहे.

एसी लोकलबाबत मध्य रेल्वे ठाम?

मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे आणि वातानुकूलित लोकल चालवणे ही त्यापैकी एक आहे. वातानुकूलित लोकलला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.