AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, मी बाबासाहेबांचा… प्रकाश आंबेडकर यांची नारायण राणेंवर सडकून टीका

गेल्या 70 वर्षात अनेक वेळा सत्तापालट झाला. हा सत्तापालट शांततेने पार पडला. यावेळी सत्ता पालट होईल की नाही हे निवडणूक निकालात स्पष्ट होईल. पण निकालाआधी दंगलीचं, अराजकाचं वातावरण दिसेल, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, मी बाबासाहेबांचा... प्रकाश आंबेडकर यांची नारायण राणेंवर सडकून टीका
prakash ambedkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशात गोध्रा आणि मणिपूरसारखी परिस्थिती होणार असल्याचा दावा केला होता. देशात निवडणुकीच्या पूर्वी दंगली होतील. परिस्थिती हाताबाहेर जाईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली होती. आंबेडकरांना ही माहिती कशी मिळाली? त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे, असं राणे म्हणाले होते. राणेंच्या या टीकेचा प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशात अराजकता माजवली जाऊ शकते. तसं प्लॅनिंगही सुरू आहे. नारायण राणेंना एवढंच सांगतो. चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी बाबासाहेंबाचा नातू आहे. एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी या देशातील अनेक अधिकारी बाबासाहेबांना या देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला माहिती देत असतात. त्यामागे ही घटना घडू नये ही अपेक्षा असते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुस्लिमांसारखं सामंजस्य दाखवा

माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. डोकं भडकवण्याचं काम होणार आहे. त्यामुळे सावध राहा. जे सामंजस्य मुस्लिमांनी दाखवलं तेच सामंजस्य दाखवा. गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद साजरी करणार नाही, असं मुस्लिमांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हे सामंजस्य वाखाणण्यासारखं आहे. तुम्हीही तेच सामंजस्य दाखवा. दिवाळीनंतर देशातील परिस्थिती हाताबाहेर जाईल. गोध्रा आणि मणिपूर होणार नाही याची काळजी घ्या. मानवतेला काळीमा लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची असते तशी जनतेनेही घ्यायची आहे, असं आंबेडकर म्हणाले.

अनेकांना नोटिसा

सत्ताधाऱ्यांना आदिवासींचे हक्क आणि दलितांचं आरक्षण संपवायचं आहे. हे दोन समूह विरोधात जातील हे लक्षात घेऊन शहरी नक्षलवाद आणि नक्षलवाद याच्या नावाखाली तुरुंगात टाकण्याचं आणि नोटीस देण्याचं काम सुरू झालं आहे. आहे. आज सकाळी काही लोकांना नोटीस बजावली आहे. तुमच्यावर एनआयएची चौकशी का लावू नये असं नोटिशीत म्हटलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Follow Us
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर
कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे...
Kolhapur Rain Update | कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा! पंचगंगा दुथडी भरून वाहतेय; 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच...