राज्यात पोपट मरतात, कावळे मरतात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र

पोपट मरतायत, कावळे, बगळे, पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात माणसं सुरक्षित नाहीत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले (Pravin Darekar MVA Government)

राज्यात पोपट मरतात, कावळे मरतात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित, प्रविण दरेकरांचं टीकास्त्र
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 7:25 PM

रायगड: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)यांनी राज्य सरकारनं सुरक्षा काढल्याच्या निर्णयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. हा खरं म्हणजे सूड भावनेने घेतलेला निर्णय आहे. राजकीय नेत्यांना दिलेली सुरक्षा सविंधानानं दिलेला प्रोटोकॉल आहे. देवेंद्र फडणवीस किंवा मी सुरक्षा मागितली नव्हती. आतापर्यंत सुरक्षेच्याबाबतीत राजकीय निर्णय झाला नव्हता, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. ते रायगड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Pravin Darekar slams MVA Government over security withdrawal issue)

आमची सुरक्षा काढली तरी हरकत नाही. आम्ही जनतेत फिरत राहणार, आमच्यावर दबाव आणला तरी फरक पडणार नाही. मात्र, राज्यातील जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं, सुरक्षा कपातीसारख्या राजकीय उठाठेवी करण्यापेक्षा जनतेच्या हिताकडं लक्ष द्यावं, असंही प्रविण दरेकर म्हणाले. राज्यात सरकारच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकं दगावत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला. राज्य सरकानं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असा सल्ला राज्य सरकारला दिला.

राज्यात फक्त महाविकास आघाडीचे नेतेच सुरक्षित

महाविकास आघाडी सरकारच्या काळात माणसं सुरक्षित नाहीत, पक्षी सुरक्षित नाहीत.राज्यात पोपट मरतायत, कावळे, बगळे, पशु पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात माणसं सुरक्षित नाहीत फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहे, असा टोला प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे. राज्य सरकारनं सुरक्षेच्या कवचातून बाहेर यावं आणि जनतेसाठी काम करावं, असं प्रविण दरेकर म्हणाले.

धावत्या जगाचं, धावतं बुलेटीन, पाहा न्यूज टॉप 9, दररोज रात्री 9 वा. टीव्ही 9 मराठीवर

महाराष्ट्र असुरक्षित झाला तरी सरकार सुरक्षित राहिला पाहिजे या कवचातून बाहेर या, असं आवाहन प्रविण दरेकर यांनी केलं आहे. राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे सरकार सत्तेत आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.नवजात बालकांपासून आबालवृद्ध महिला असुरक्षित होत्या. आता तर कावळे, बगळे पशू पक्षी देखील मरायला लागलेत. या राज्यात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित आहेत बाकी सर्व असुरक्षित आहेत, असं प्रविण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंचे चाहते हेच त्यांचं कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेवावं, सुरक्षा कपातीवर रुपाली पाटील भडकल्या

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला, चंद्रकांत पाटलांची उपरोधिक टीका

(Pravin Darekar slams MVA Government over security withdrawal issue)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.