AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूपीए सरकारचा काळ लकवा मारलेला, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, म्हणाले, २०१४ पासून…

निर्णय न घेणं हा या सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता. निर्णय लकवा, अशाप्रकारची त्या सरकारची नीती होती. असा त्या सरकारचा उल्लेख केला जायचा.

यूपीए सरकारचा काळ लकवा मारलेला, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, म्हणाले, २०१४ पासून...
| Updated on: May 29, 2023 | 4:35 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडतोय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युपीए सरकारला लकवा मारलेला. २०१४ नंतर देशाचा वेगाने विकास झाला. मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीच्या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांनी यूपीए सरकारवर ताशेरे ओढले. फडणवीस म्हणाले, २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये आपण यूपीएचं सरकार बघीतलं. निर्णय न घेणं हा या सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता. निर्णय लकवा, अशाप्रकारची त्या सरकारची नीती होती. असा त्या सरकारचा उल्लेख केला जायचा.

नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून मागील नऊ वर्षात अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आपण बघीतली. अतिशय जोमाचा विकास आपण बघीतला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्षे झालीत. यानिमित्त मुंबई भाजपतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे आदी मंचावर उपस्थित होते.

यूपीएच्या काळात मोठे स्कॅम

९ वर्षे झाल्याबद्दल भाजपने महासंपर्क अभियान सुरू केलंय. या ९ वर्षांच्या उपलब्धी सांगण्यात आल्या. स्कॅम जेवढे यूपीएच्या काळात झाले तेवढे स्वतंत्र भारताच्या काळात कधीही झाले नव्हते.

मोदी यांचे सरकार आल्यानंतर मागील ९ वर्षांत अतिशय गतीमान निर्णय प्रक्रिया बघीतली. एकही डाग सरकारवर लावू शकलं नाही. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था डिलिव्हरी सिस्टीम होती. ती करप्शन फ्री करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला. तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. गरीबांचे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहचले.

७० कोटी डोजेस मोफत

देशात विविध योजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या. लाभार्थींचा वापर केला तर महाराष्ट्राचा विचार केला कोरोनाच्या काळात ७० कोटी डोजेस मोफत देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले.

पीएम आवास योजना २५ लाख घरं बांधून तयार झाली. अनेक घरांचे काम सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ पोहचला. अशा मोदी सरकारच्या विविध उपलब्ध देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.