AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahavikas Aghadi : खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय… घोषणाबाजी करत विरोधकांचं सरकारविरोधात आंदोलन

राज्यात पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन केले. राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय... अशा घोषणांनी विधीमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता.

Mahavikas Aghadi : खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय... घोषणाबाजी करत विरोधकांचं सरकारविरोधात आंदोलन
विरोधकांचे राज्य सरकारविरोधात आंदोलनImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 17, 2022 | 11:11 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अर्थात विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात आंदोलन केले आहे. राज्य सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सरकार येवून 45 दिवस झाले. कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत, कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे. ओला दुष्काळ (Flood) जाहीर करावा, अशा विविध मागण्या राज्य सरकारकडे करत आंदोलन केले. राज्य सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले, गद्दार आले, 50 खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी विधीमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता. खाते वाटपावरूनही भांडणे सुरू आहेत. यावरूनही महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

‘खातेवाटपावरून गोंधळ सुरू’

वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती म्हणजे विकासावरून मुद्दा हिंदुत्वाकडे भरकटविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर राज्य सरकारकडून केला जात आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारमधील आमदार मात्र खाते वाटपावरून नाराज आहेत. राज्यातील समस्या त्यांना दिसत नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही, असा संताप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

विरोधकांचे आंदोलन

अजित पवारांनी केला हल्लाबोल

विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच शपथ घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे, असे काल अजित पवार यांनी म्हटले होते. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, विरोधकांची अवस्था केविलवाणी झाल्याचे गिरीष महाजन म्हणाले आहेत. अनेकांची चौकशी होत आहे. त्यामुळे ईडील दोष देऊन काही उपयोग नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर