आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या […]

आयुक्तांना भेटून ऑडिटची मागणी केली होती, पुढे काहीच घडलं नाही : राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात असल्याचं म्हटलंय. शिवाय या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. अगोदर एल्फिनस्टन चेंगराचेंगरी आणि त्यानंतर अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मनसेने सनदशीर मार्गाने ऑडिटची मागणी केली होती, ज्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.

सप्टेंबर 2017 मध्ये एलफिन्टन चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांचा जीव गेला होता. त्यानंतर नंतर अंधेरीतही अशीच एक घटना घडली. मनसेने रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढून ऑडिटची मागणी केली होती. अधिकाऱ्यांनी ऑडिट करु, असं आश्वासन दिलं. मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून सहकार्याची मागणी केली. पण पुढे काहीच घडलं नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश देणाऱ्या रेल्वेमंत्र्यांवरही राज ठाकरेंनी रोष व्यक्त केलाय. ट्विटरवरुन नेहमीप्रमाणे रेल्वे मंत्री चौकशीचे आदेश देऊन टिमकी वाजवतील. मनसेने सनदशीर मार्गाने ऑडिटची मागणी केली होती, पण यांना सनदशीर मार्ग समजत नाही हे दुर्दैवं असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, शिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांनी घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचे आदेश दिले. शिवाय पुलाविषयी आयुक्तांकडून माहिती घेतली. या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. ऑडिटमध्येच दोष होता का याचीही चौकशी होईल आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.