AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 05, 2022 | 7:59 PM
Share

मुंबईः मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Duri) यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर मनसेच्या नेत्यांच्या संकटात वाढ होताना दिसून येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या हेमंत पाटील यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

हिंदूना भडकावण्याचे काम

हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे हे ठाणे, मुंबई या ठिकाणी हिंदूना भडकावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून ही गोष्ट करण्यात येत असल्याने ही घटना नियमबाह्य असून संविधानाला धरुन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक सलोखा बिघडला

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व पोलिसांचे धन्यवाद

राज ठाकरे यांच्या भडकावू भाषणामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हिंदू मुस्लिम वाद होण्याची शक्यताही होती, मात्र मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यात वाद झाले नाहीत. राज्य शांत ठेवल्याबद्दल आणि समाजात कोणतीही दुही माजवली गेली नाही त्याबद्दल हेमंत पाटील यांनी सर्व पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप