AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार? 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 05, 2022 | 7:59 PM
Share

मुंबईः मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Duri) यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढल्यानंतर मनसेच्या नेत्यांच्या संकटात वाढ होताना दिसून येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या हेमंत पाटील यांच्यावतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

हिंदूना भडकावण्याचे काम

हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे हे ठाणे, मुंबई या ठिकाणी हिंदूना भडकावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडून ही गोष्ट करण्यात येत असल्याने ही घटना नियमबाह्य असून संविधानाला धरुन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक सलोखा बिघडला

राज ठाकरे हे जे काही भडकाऊ भाषण करत आहेत, त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही हेमंत पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्रही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्व पोलिसांचे धन्यवाद

राज ठाकरे यांच्या भडकावू भाषणामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हिंदू मुस्लिम वाद होण्याची शक्यताही होती, मात्र मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यात वाद झाले नाहीत. राज्य शांत ठेवल्याबद्दल आणि समाजात कोणतीही दुही माजवली गेली नाही त्याबद्दल हेमंत पाटील यांनी सर्व पोलिसांचे धन्यवाद मानले आहेत.

Follow Us
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?