AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नव्या ट्विटनंतर पुन्हा अशी चर्चा

महाराष्ट्रासाठी एकत्र येणे म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे, असे नाही. मराठी, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरते सुद्धा एकत्र येता येऊ शकते. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामीळ पक्ष एकत्र येतात, तसे मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे?

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नव्या ट्विटनंतर पुन्हा अशी चर्चा
राज ठाकरे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 20, 2025 | 7:56 AM
Share

ठाकरे कुटुंबातील दोन नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह शनिवारी निर्माण झाली होती. राज ठाकरे यांनी युतीसाठी पहिले पाऊल टाकले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे स्पष्टच संकेत दिले. एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, आमच्यामधील भांडणे फार लहान आहे. एकत्र येणे, एकत्र राहणे हे कठीण नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठाच्या कामगार मेळाव्यातून राज ठाकरे यांच्या प्रस्तावास सशर्त प्रतिसाद दिला. भाजप आणि शिंदे सेनेसोबत संबंध तोडण्याची अट उद्धव ठाकरे यांनी घातली. परंतु आता संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटनंतर संभ्रम निर्माण झाला आहे.

शनिवारचा दिवस ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा ठरला. राज ठाकरे यांची युतीची तयारी, उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेला प्रतिसाद, संजय राऊत यांची पत्रकार परिषद त्यानंतर संदीप देशपांडे यांनी मांडलेली वेगळी भूमिका त्यामुळे ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन वेळा फसवले असल्याचे म्हटले होते. शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिल्याचे संदीप देशपांडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ट्विट केले आहे.

काय आहे ट्विटमध्ये…

संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, महाराष्ट्रासाठी एकत्र येणे म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे, असे नाही. मराठी, महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरते सुद्धा एकत्र येता येऊ शकते. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामीळ पक्ष एकत्र येतात, तसे मराठी पक्षांनी एकत्र यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे.

आणखी एका ट्विटमधून ते म्हणतात, तू एवढ्या जागा लढ. मी एवढ्या लढवतो. तू ही जागा लढव. मी ही जागा लढवतो. तुला हे पद, मला हे पद. इतका मर्यादीत विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीच्या चर्चा फक्त चर्चाच ठरणार की काय? अशी शक्यता आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.