AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशारा

Sanjay Raut: काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांची सुरक्षा, त्यांच्या सोयीसुविधा हा मोदी शहांचा मुख्य अजेंडा होता. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता.

Sanjay Raut: लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशारा
लक्षात ठेवा, त्याच कबरीमध्ये तुम्हालाही जावे लागेल; संजय राऊतांचा एमआयएमला इशाराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2022 | 12:54 PM
Share

मुंबई: एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदू महासंघाने (hindu maha sangh) तर औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवाल करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही ओवैसींवर टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत. वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे. पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे. कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. यावेळी त्यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. काश्मिरी पंडितांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिक इमोशनल आहेत. त्यांनी सहा सात वर्षांत काय केलं माहीत नाही. पण अजूनही काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. काल एका सरकारी कर्मचाऱी असलेल्या काश्मिरी पंडिताची हत्या झाली आहे. ज्याप्रकारे ही हत्या झाली, ते चिंताजनक आहे. याची शहांनी याची गंभीर दखल घ्यावी. नेहमी पाकिस्तानकडे बोट दाखवण्याची गरज नाही. आपण काश्मिरी पंडितांसाठी काय करणार आहोत? 370 नंतरही काश्मिरी पंडित आणि सामान्य जनता सुरक्षित नाहीये. काश्मिरात अस्थिर आणि अशांतेचा माहोल आहे, असं राऊत म्हणाले.

काश्मीर पंडितांची समस्या सुटली नाही

काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांची सुरक्षा, त्यांच्या सोयीसुविधा हा मोदी शहांचा मुख्य अजेंडा होता. शिवसेनेचा त्याला पाठिंबा होता. तरिही काश्मिरी पंडितांची समस्या अजूनही संपलेली नाही. काश्मिरी पंडितच नव्हे तिथला सामान्य माणूसही सुरक्षित नाही, असं वातावरण तयार केलं जातंय. शिवसेना काश्मीर पंडितांच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहतेय. सरकार काय करतंय..? एका बाजुला चीन घुसलाय, दुसरीकडे काश्मिरात अशांतता आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.