AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनावरुन वाद पेटणार? राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांनीही साधला मोदींवर निशाणा

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर जोरदार निशाणा साधला. नव्या संसद भवनाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यास त्यांनी विरोध दर्शवला.

नव्या संसद भवनाच्या उद्धघाटनावरुन वाद पेटणार? राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांनीही साधला मोदींवर निशाणा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 23, 2023 | 11:23 AM
Share

मुंबई : येत्या रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. आता राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी संजय राऊत पुढे आले आहे. राष्ट्रपतींना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. देशात लोकशाहीचा मुडदा पडला जात असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

काय म्हणाले राऊत

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या दोन कालखंडात राष्ट्रपतीपदावरील व्यक्तींचा वारंवार अवमान केला जात आहे. राष्ट्रपतीपदावर अशाच व्यक्तींना बसले की जे काही प्रश्न विचारणार नाही. आता संसद भवनाच्या उद्धघाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते न होणे, हा त्यांचा मोठा अवमान आहे. आता राष्ट्रपतींना निवडणुकीसाठी बाहेर काढले जाणार असल्याचे त्यांनी केले. यासंदर्भात राहुल गांधी यांना मांडलेल्या भूमिकाला आमचा पाठिंबा आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर निशाणा साधला.

मोदींच्या पराभवानंतर उमेदवार ठरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२४ मध्ये पराभव होणार आहे. यासाठी विरोध एकत्र आले आहे. मोदींचा पराभव झाल्यानंतर विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. जयंत पाटील यांना आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले.

राहुल गांधी काय म्हणाले होते

स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबतची माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं राहुल गांधी यांना पटलेलं नाही. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. पंतप्रधानांच्या नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होते. त्या भूमिकेला संजय राऊत यांनीही पाठिंबा दिला आहे.

862 कोटींचा खर्च

नवं संसद भवन त्रिकोणी आकाराचं बनलेलं आहे. हे संसद भवन चार मजली इमारतीचं आहे. संसद भवनाचा संपूर्ण परिसर 64500 वर्ग मीटरचा आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी 862 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नव्या संसद भवनात एक संविधान हॉल आहे. त्यात लोकशाहीचा वारसा दाखवला जाणार आहे. त्याशिवाय खासदारांसाठी लाऊंज, अनेक कमिटी रूम, डायनिंग एरिआ आणि पार्किंग स्पेसही असणार आहे.

किती सदस्य बसणार?

नव्या संसद भवनात लोकसभेचे 888 आणि राज्यसभेचे 384 सदस्य बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यमान संसद भवनात 550 लोकसभा सदस्य आणि राज्यसभेत 250 सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा हा एक भाग आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....