AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं…

2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.

मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरु, संजय राऊत असं का बोलले? शंभूराज देसाई यांनी सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2023 | 4:43 PM
Share

मुंबई : राज्यातलं सरकार (Maharashtra Govt) येत्या १५ दिवसात बदलणार. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरु झाल्यात असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावरून शिंदे गटाच्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावरच पलटवार केलाय. संजय राऊत यांना इथं बसून दिल्लीत काय सुरु आहे हे कसं कळतं? ते काय अंतर्यामी आहेत का, असा सवाल शंभूराज देसाईंनी केलाय. एकिकडे महाविकास आघाडी एकत्र राहिल की नाही, यावरून शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं असताना संजय राऊत हे शिंदे-भाजप युतीवर बोलतायत. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून, अशी स्थिती झाल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली…

संजय राऊत असं का म्हणाले?

दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आलाय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पण राऊत यांनी हे वक्तव्य नेमकं का केलं, याचं कारण शंभूराज देसाई यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ 2024 पर्यंत महाविकास आघाडी टिकून राहिल नाही नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. महाविकास आघाडी स्थापन करताना शऱद पवार यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. त्याच पवार साहेबांना आता ही महाविकास आघाडी 2024 ची निवडणूक लढेल की नाही, असं वाटत असेल … त्यांच्या मनात शंका निर्माण झाल्यानेच त्यांनी हे वक्तव्य केलंय. या वक्तव्यापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करायचं म्हणून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु असल्याचं वक्तव्य केलंय, असं शंभूराज देसाई म्हणालेत.

दोन वेळा विधानसभेत आम्ही 170 प्लसचं बहुमत शाबित करून दाखवलं आहे. अजून वाटत असेल तर विधानसभेत कोणत्याही आयुधाच्या माध्यमातून तुम्ही प्रस्ताव आणा. आता असा प्रस्ताव आला तर आम्ही 180-85 च्या पुढे बहुमत दाखवू. शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्रपक्ष एकत्र आहोत. युती भक्कम आहे. भाजपच्या मोठ्या नेतृत्वाने यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. 2024 च्या निवडणुकीतही युती भक्कम आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याची संजय राऊत यांना गरज नाही, असा सल्ला शंभूराज देसाई यांनी दिलाय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.