AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी वाद : दोन मुद्द्यांनी शिर्डीकरांचं समाधान, वादावर तोडगा निघाल्याची भावना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिर्डीच्या शिष्टमंडळाने समाधान झाल्याचं म्हणत, आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली.

शिर्डी वाद : दोन मुद्द्यांनी शिर्डीकरांचं समाधान, वादावर तोडगा निघाल्याची भावना
| Updated on: Jan 20, 2020 | 4:48 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिर्डीच्या शिष्टमंडळाने समाधान झाल्याचं म्हणत, आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. शिर्डीचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीनंतर माध्यमांना (Shirdi Saibaba Birthplace dispute) माहिती दिली.  “शिर्डींच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. शिर्डीची आणि ग्रामस्थांची भूमिका बैठकीत (Shirdi Saibaba Birthplace dispute) मांडली. शिर्डी ग्रामस्थांचं समाधान झालेलं आहे. त्यामुळे शिर्डीतील आंदोलन मागे घेण्यात आले आहे”, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.

शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडेंची प्रतिक्रिया

दरम्यान शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही माध्यमांशी संवाद साधून, मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाबाबतचं आपलं विधान मागे घेतल्याचं सांगितलं. शिर्डीकर आणि पाथरीकरांचं समाधान होईल, अशी चर्चा झाल्याचं खासदार लोखंडे म्हणाले.

दोन मुद्यावरुन तोडगा

शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी जन्मस्थळाबाबतचं वक्तव्य मागे घेतलं. तर पाथरीच्या तीर्थस्थळ विकासालाही निधी देण्याचं मंजूर करण्यात आलं. या दोन मुद्द्यावरुन आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका शिर्डीकरांनी जाहीर केली.

नेमका वाद काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा शंभर कोटींचा विकास आराखडा तयार आहे’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन शिर्डीकर आक्रमक झाले होते. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी बंदची हाक दिली. पाथरीच्या विकासाला विरोध नाही तर मुख्यमंत्र्यांकडून पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला, त्याला विरोध असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं होतं.

साईंच्या जन्मभूमीच्या वादानंतर शिर्डीकरांनी कडकडीत बेमुदत बंदची घोषणा केली होती. रविवारी पहिल्या दिवशी शिर्डीत अगदी कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे साईभक्तांची बरेच हालही झाले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना बंद मागे घेत चर्चेसाठी बोलावलं. आज मंत्रालयात त्याच विषयी बैठक झाली.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.