AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”; शिवसेनेच्या नेत्यानं निवडणुकीतील विश्वास बोलून दाखवला

कसाब पोटनिवडणुकीत पैसे वाटप झाल्याच्या आरोपाबद्दल बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्याकडून हाआरोप केला जात असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू; शिवसेनेच्या नेत्यानं निवडणुकीतील विश्वास बोलून दाखवला
| Updated on: Feb 25, 2023 | 9:17 PM
Share

मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीगाठीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणात काही फरक होणार का किंवा केजरीवाल यांच्या भेटीचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या भेटीचं विश्लेषण करताना मंत्री उदय सामंत यांनी मात्र या भेटीगाठीचा कोणताही फरक राज्याच्या राजकारणावर होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

त्याच बरोबर हे आपला महाराष्ट्रात कोणाची ना कोणाची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटालाही कोणाची तरी गरज असल्यामुळेच त्यांनी या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांची भेट झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या भेटीगाठी झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या मताला किंमत शून्य असल्याची टीका त्यांनी केली आहे.

आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीचा विचार करताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, आता ठाकरे गटाला कुणाची ना कुणाच्या आधाराची गरज आहे.

तर दुसरीकडे आपला महाराष्ट्रात शून्य किंमत असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी 45 खासदार निवडून येतील तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कसाब पोटनिवडणुकीत पैसे वाटप झाल्याच्या आरोपाबद्दल बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्याकडून हाआरोप केला जात असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.