AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना जनतेनंच डिलीट केलं; शिवसेनेनं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं..

किरण पावसकर यांनी महाविकास आघाडीवर शिंदे यांच्याकडून राजकीय अस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना जनतेनंच डिलीट केलं; शिवसेनेनं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं..
| Updated on: Mar 30, 2023 | 12:28 AM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी. वाय. पाटील विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी डी. लिट पदवी बहाल केली आहे. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकनाथ शिंदे यांना डी. लिट पदवी मिळाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी कधी शस्त्रक्रिया केली होती असा खोचक सवाल त्यांनी केला होता. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. लिट पदवी मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून अनेक सवाल उपस्थित केले होते. तर एकनाथ शिंदे यांनी डी. लिट पदवी मिळाल्यानंतर ही पदवी मिळण्याआधीच मी शस्त्रक्रिया केल्या आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता.

त्यावर संजय राऊत यांनी त्यांनी कधी शस्त्रक्रिया केली होती असा सवाल उपस्थित केला होता. आणि त्यांच्यावर टीकाही केली होती.

त्यावर किरण पावसकर यांनी संजय राऊत स्वतःला नेते आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते समजत असले तरी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्यांना जनतेनेचे डिलिट केले आहे असा टोला त्यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटाला लगावला आहे.

तर एकनाथ शिंदे यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यातच शिवसेनेवर शस्त्रक्रिया केल्याची टीका त्यांनी केली आहे.

तर किरण पावसकर यांनी महाविकास आघाडीवर शिंदे यांच्याकडून राजकीय अस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे, त्यांना आता मतदारांनीच डिलिट करून टाकले आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.