AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | अधिवेशन बोलवण्यात फायदा आहे का? महाधिवक्ते खूप महत्त्वाच बोलले

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. स्वत: या आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशन बोलवा अशी भूमिका घेतली आहे. यावर आता राज्याच्या महाधिवक्त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

Maratha Reservation | अधिवेशन बोलवण्यात फायदा आहे का? महाधिवक्ते खूप महत्त्वाच बोलले
all party meet on maratha arakshanImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2023 | 7:23 AM
Share

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापल आहे. मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. तात्काळ आरक्षण द्या अशी मराठा समाजाची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचा चेहरा आहेत. झटपट आरक्षणाचा निर्णय घ्या अशी त्यांची भूमिका आहे. मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही, तर आज संध्याकाळपासून त्यांनी पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर ते पाणी सुद्धा घेत नव्हते. त्यामुळे सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली. ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. अखेर समाजाच्या पुढे मी नाही जाणार, असं म्हणत त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले होते. आता ते पाणी पित आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत थोडी चांगली आहे.

आज सकाळी मीडियाला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर आज संध्याकाळपासून ते पाणी बंद करणार आहेत. असं झाल्यास त्यांची प्रकृती आणखी ढासळू शकते. कारण आधीच त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीय. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होईल. त्यांनी मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधानसभेच अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीय. पण या अधिवेशनाने खरच प्रश्न सुटणार आहे का?. मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो का? यावर राज्याच्या महाधिक्त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका मांडलीय. मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळतोय

आज सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलीय. त्यात महाधिवक्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं महाधिवक्ते तृषार मेहता म्हणाले. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवण्यात काय फायदा आहे? हा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळत चाललाय. काही ठिकाणी राज्यात हिंसाचाराच्या घटना घडतायत.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!