AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | अधिवेशन बोलवण्यात फायदा आहे का? महाधिवक्ते खूप महत्त्वाच बोलले

Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. स्वत: या आंदोलनाचा चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशन बोलवा अशी भूमिका घेतली आहे. यावर आता राज्याच्या महाधिवक्त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

Maratha Reservation | अधिवेशन बोलवण्यात फायदा आहे का? महाधिवक्ते खूप महत्त्वाच बोलले
all party meet on maratha arakshanImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 02, 2023 | 7:23 AM
Share

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापल आहे. मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. तात्काळ आरक्षण द्या अशी मराठा समाजाची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचा चेहरा आहेत. झटपट आरक्षणाचा निर्णय घ्या अशी त्यांची भूमिका आहे. मराठा आरक्षणाबद्दल निर्णय घेतला नाही, तर आज संध्याकाळपासून त्यांनी पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर ते पाणी सुद्धा घेत नव्हते. त्यामुळे सहाव्यादिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली. ते स्टेजवरच कोसळले होते. त्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. अखेर समाजाच्या पुढे मी नाही जाणार, असं म्हणत त्यांनी पाण्याचे काही घोट घेतले होते. आता ते पाणी पित आहेत, त्यामुळे त्यांची तब्येत थोडी चांगली आहे.

आज सकाळी मीडियाला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर आज संध्याकाळपासून ते पाणी बंद करणार आहेत. असं झाल्यास त्यांची प्रकृती आणखी ढासळू शकते. कारण आधीच त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाहीय. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होईल. त्यांनी मराठा आरक्षणासाठी तात्काळ विधानसभेच अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीय. पण या अधिवेशनाने खरच प्रश्न सुटणार आहे का?. मराठा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो का? यावर राज्याच्या महाधिक्त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका मांडलीय. मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळतोय

आज सहयाद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलीय. त्यात महाधिवक्त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं महाधिवक्ते तृषार मेहता म्हणाले. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलवण्यात काय फायदा आहे? हा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय चिघळत चाललाय. काही ठिकाणी राज्यात हिंसाचाराच्या घटना घडतायत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.