AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे अभिनंदन केले; म्हणाले सरकारने सत्य मान्य केले…

शिंदे-फडणवीस सरकारने जर आज हे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हे मान्य करत असतील तर अजित पवार हे सत्य बोलत होते हेच त्यातून स्पष्ट होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे अभिनंदन केले; म्हणाले सरकारने सत्य मान्य केले...
| Updated on: Feb 28, 2023 | 12:41 AM
Share

मुंबईः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख त्यांनी स्वराज्यरक्षक केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह अजित पवार यांच्या विरोधकांनी राज्यभर जोरदार आंदोलन केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच मात्र ते खरे धर्मवीर होते अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. तर त्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना त्यांनी स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला आहे.

त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, म्हणजे आता सरकारने सत्य मान्य केले आहे संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत. त्याबद्दल सरकारचे खरं तर अभिनंदन केले पाहिजे असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक केला होता. त्यांनंतर राज्यभर वेगवेगळे पडसाद उमटले असले तरी आता सरकारने अजित पवार चुकीचे काही बोलले नाहीत, ते बरोबर होते हेच या सरकारने मान्य केले आहे असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने जर आज हे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हे मान्य करत असतील तर अजित पवार हे सत्य बोलत होते हेच त्यातून स्पष्ट होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य त्यांनी कशा पद्धतीने अबाधित ठेवले होते. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी हे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपली आघाडी उघडली असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांभाळलेही आणि त्या स्वराज्याचे तेच खरे स्वराज्यरक्षकही झाले असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.