AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे अभिनंदन केले; म्हणाले सरकारने सत्य मान्य केले…

शिंदे-फडणवीस सरकारने जर आज हे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हे मान्य करत असतील तर अजित पवार हे सत्य बोलत होते हेच त्यातून स्पष्ट होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे अभिनंदन केले; म्हणाले सरकारने सत्य मान्य केले...
| Updated on: Feb 28, 2023 | 12:41 AM
Share

मुंबईः हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख त्यांनी स्वराज्यरक्षक केला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह अजित पवार यांच्या विरोधकांनी राज्यभर जोरदार आंदोलन केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच मात्र ते खरे धर्मवीर होते अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली होती. तर त्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करताना त्यांनी स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला आहे.

त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, म्हणजे आता सरकारने सत्य मान्य केले आहे संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत. त्याबद्दल सरकारचे खरं तर अभिनंदन केले पाहिजे असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक केला होता. त्यांनंतर राज्यभर वेगवेगळे पडसाद उमटले असले तरी आता सरकारने अजित पवार चुकीचे काही बोलले नाहीत, ते बरोबर होते हेच या सरकारने मान्य केले आहे असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने जर आज हे स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हे मान्य करत असतील तर अजित पवार हे सत्य बोलत होते हेच त्यातून स्पष्ट होते असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य त्यांनी कशा पद्धतीने अबाधित ठेवले होते. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी हे स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी आपली आघाडी उघडली असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांभाळलेही आणि त्या स्वराज्याचे तेच खरे स्वराज्यरक्षकही झाले असंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.