Tauktae Cyclone in Mumbai | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी

सध्या तौक्ते चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर  आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.  (Tauktae Cyclone Update Mumbai Rain with Gusty winds)

Tauktae Cyclone in Mumbai | तौत्के चक्रीवादळ मुंबईपासून 150 किमी अंतरावर, पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार, ऑरेंज अलर्ट जारी
Tauktae
| Edited By: | Updated on: May 17, 2021 | 1:06 PM

मुंबई : केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत रौदरुप धारण केलेल्या तौत्के चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मध्यरात्रीपासूनच मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Tauktae Cyclone Update Mumbai Rain with Gusty winds)

मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट

मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर  आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईत आज 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

तौत्के चक्रीवादळाचा आज रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार आहे. या वादळाचा वेग तासागणिक वाढत चालला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना

तौक्त चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केलं जात आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Tauktae Cyclone Update Mumbai Rain with Gusty winds)

संबंधित बातम्या :

Cyclone in Maharashtra : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील 6 हजार 500 पेक्षा जास्त नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित, प्रशासनाची खबरदारी

Tauktae Cyclone | तौक्ते चक्रीवादळ पालघरच्या दिशेने, पहाटे 5 वाजता धडकणार, लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना