AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला नमक हराम-2 हा सिनेमा काढायचाय, सर्व नमकहरामांचा… संजय राऊत यांचा जोरदार हल्ला

ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची गडकरी रंगायतन सभागृहात सभा आहे. या सभेआधी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यानंतर आपल्या भाषणातून बोलताना संजय राऊत यांनी जोरदाल हल्ला चढवला.

मला नमक हराम-2 हा सिनेमा काढायचाय, सर्व नमकहरामांचा... संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 10, 2024 | 9:24 PM
Share

ज्या ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आपला भगवा सप्ताह आहे. त्यांचा आम्हाला जगवा सप्ताह आहे. दिल्लीत जातात मोदींना म्हणतात आम्हाला जगवा. सध्या ते सिनेमे फार काढत आहेत. ते मुख्यमंत्री आहेत की दिग्दर्शक. मलाही एक सिनेमा काढायाचा आहे. नमक हराम टू. माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे. एक नमक हराम आला होता. अमिताभ आणि राजेश खन्नाचा. मी चांगला लेखक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. मी राजकारण घडवतो. बाळासाहेबांनी शिकवलं राजकारण घडवलं पाहिजे, बिघडवलं पाहिजे. तेव्हा मी नमक हराम सिनेमा काढणार आहे. या नमकहरामांची पोलखोल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणींची किंमत दीड हजार फक्त दीड हजार. आमदारांना दीड कोटी. जी लाडकी बहीण शिवसेनेसोबत राहिल तिच्या घरावर बुलडोझर. हा गुजरात पॅटर्न आहे. तो महाराष्ट्रात चालणार नाही. उद्धव ठाकरे यांचा दिल्लीचा दौरा अभिमान वाटावा असा झाला. देशाच्या राजधानीत जेव्हा उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं. तेव्हा अहमद शाह अब्दाली घाबरून घरात बसला होता. कुणी बाहेर आलं नसल्याचं  म्हणत राऊतांनी टीका केली.

मोदी आणि शाह यांच्या १०० पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांचं राज्यावरील ऋण पुसता येणार नाही. तुम्ही कितीही मिंधे निर्माण करा. हे मिंधे येतील आणि जातील. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला. आमचा तो आदर्श नाही. आमचा शिवाजी महाराज हा आदर्श आहे. पुढील दोन महिन्याची लढाई महत्त्वाची आहे. ही लढाई जिंकलो तर आपणलं पुढचे २५ वर्ष राज्यात सत्ता राहिल, असं राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.