AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदीसाहेब जातात”; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपची रणनितीच स्पष्ट करुन सांगितली…

पूर्वी शिवसेनेने जी कामं आखली होती त्यांचे उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

जिथे जिथे निवडणुका येतात त्याच ठिकाणी मोदीसाहेब जातात; ठाकरे गटाच्या नेत्याने भाजपची रणनितीच स्पष्ट करुन सांगितली...
| Updated on: Jan 19, 2023 | 4:14 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत असल्याने आणि येत्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यानेच त्या डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मुंबईमध्ये मोदीसाहेब येत आहेत म्हणजे आपण समजलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ घातली आहे असा टोला त्यांनी भारतीय जनता पार्टीला लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेगवेगळ्या कामांचे उद्घाटन होणार असल्याने भाजपच्या नेत्यांकडूनही वेगवेगळी अश्वासनं दिली जात आहे, आणि विकासकामांविषयी बोलले जात आहे.

त्यामुळे भास्करराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टी ही वाचाळवीरांची पार्टी असल्याची खोचक टीका करण्यात आली आहे.

ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत असतात, त्या त्या ठिकाणी भाजपकडून नरेंद्रम मोदी येत असतात. कोरोनाच्या काळात मुंबई मोठ्या संकटात होती मात्र त्यावेळी नरेंद्र मोदी मुंबईत आले नाहीत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

भास्करराव जाधव यांनी कोरोना काळातील संकटाची आठवण करून देत नरेंद्र मोदी यांनी ऐन कोरोनाच्या काळातच मुंबईची विशेष काळजी घेतलेली नव्हती तर आता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले असल्याची टीका भास्कररावर जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे.

विकास कामांवरून आता श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आली होती.

त्याच कामांवरून आता श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जी विकास कामं करण्यात आली होती, त्याच विकास कामांचे उद्घाटन नरेंद्र मोदी करणार असल्याची टीका भास्करराव जाधव यांनी केली आहे.

यावर बोलताना ते म्हणाले की, पूर्वी शिवसेनेने जी कामं आखली होती त्यांचे उद्घाटन करण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

विकास कामांवरून ज्या प्रमाणे टीका करण्यात आली आहे त्याच प्रमाणे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करायचं हे नरेंद्र मोदी यांची खासियत आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईत येत आहेत मात्र मुंबईची जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे असा विश्वासही भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.