AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : खड्ड्यांवरून हायकोर्टाने राज्य सरकार, पालिकांना घेतले फैलावर; न्यायालयाने सर्व पालिकांना दिले ‘हे’ आदेश

राज्यात खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याप्रकरणी सहा महापालिका आय़ुक्तांना कोर्टाने समन्स बजावले होते. त्यानुसार आज सहाही महापालिका आयुक्त सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले होते.

Mumbai News : खड्ड्यांवरून हायकोर्टाने राज्य सरकार, पालिकांना घेतले फैलावर; न्यायालयाने सर्व पालिकांना दिले 'हे' आदेश
मुंबई हायकोर्ट
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Aug 11, 2023 | 4:52 PM
Share

मुंबई / 11 ऑगस्ट 2023 : मुंबईसह महानगर क्षेत्रातील सहा महापालिकांच्या हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या प्रश्नाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज सहा महापालिकांच्या आयुक्तांना फैलावर घेतले. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी दिलेला आदेशाचे पालन न केल्याबद्दल राज्य सरकारची कानउघडणी केली. ‘सरकार म्हणून महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांची काळजी घेण्यासही तुम्ही बांधील आहात. तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. राज्य सरकारचे कर्तव्य न्यायालय करणार नाही. खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे गांभीर्याने पालन करा’, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पडल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेसह महानगर क्षेत्रातील सहा पालिकांच्या आयुक्तांना समन्स बजावले होते. न्यायालयाच्या समन्समुळे आज मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, वसई विरार मनपा आयुक्त अनिल कुमार पवार, मीरा भाईदर मनपा आयुक्त संजय काटकर न्यायालयात हजर राहिले होते.

खड्ड्यांबाबत पालिका आयुक्तांना धरले धारेवर

जागोजागी पडलेल्या खड्ड्यांबाबत मुख्य न्यायमूर्तींनी सर्व आयुक्तांना धारेवर धरले. खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यात उदासीनता का असा खडा सवाल मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी उपस्थित केला. त्यावर बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य पालिकांनी खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले. मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला असून त्यामुळे प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. पावसाचा परिणाम होऊन खड्डे बुजवण्याचे काम देखील निष्प्रभ ठरू लागले आहे, असा दावा पालिकांच्या वतीने करण्यात आला.

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!