AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रॅंटरोड ते पूर्व मूक्त मार्ग केवळ सहा मिनिटांत पोहचता येणार, ही आहे योजना

मुंबईकरांना लवकर साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा एलीवेटेड पूल मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फूटणार आहे.

ग्रॅंटरोड ते पूर्व मूक्त मार्ग केवळ सहा मिनिटांत पोहचता येणार, ही आहे योजना
ELEVATEDImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 23, 2023 | 9:55 AM
Share

मुंबई : सध्या ग्रॅंटरोड स्टेशन ते इस्टर्न फ्रि वे या अंतरासाठी वाहनाने जायला अर्धा तास ते पन्नास मिनिटे लागतात. परंतू या ठिकाणी ग्रॅंटरोड स्टेशन ते पूर्व मुक्त मार्ग असा 5.56 किमीचा एलिवेटेड पूल बांधण्याची पालिकेची महत्वाकांक्षी योजना आहे. या मार्गासाठी नुकत्याच निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. या निविदा मंजूर झाल्यास 42  महिन्यांत (पावसाळ्यासह) हा उन्नत मार्ग पूर्ण होणार असून दक्षिण मुंबईच्या पी.डीमेल्लो मार्गावरील कोंडी या मार्गामुळे कमी होणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सातत्याने विविधस्तरिय प्रयत्न अविरतपणे करण्यात येत असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लवकरच तब्बल 5.56  किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 5 हजार 560 मीटर लांबीचा हा पूल बांधण्यासाठी 662.42 कोटी (जीएसटी सह) इतका अंदाजित खर्च येणार आहे.

दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान होणार

हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी या उन्नत मार्गामुळे केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील. या उन्नत मार्गामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.

या भागातील नागरिकांना दिलासा

पूर्व मुक्तमार्गास जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होवून दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणा-या वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतूक सुरळीत होणार आहे.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत