AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली.

चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?
केंद्रीय गृहमंत्र्यांवर अरविंद सावंतांचा हल्लाबोलImage Credit source: tv 9
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Oct 09, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठविलं. यासंदर्भात अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं (Election Commission) चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे.

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही.

या पद्धतीनं भाजपचे नेते वागणूक देतील, असं वाटत होतं. देशाचे गृहमंत्री म्हणतात खरी शिवसेना शिंदे गटाची आहे. म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

ते म्हणाले, भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पाच वर्षे काही होणार नाही. सर्व जनतेला कळतंय, हे महत्त्वाचं आहे. शिंदे गटातील लोकं हे शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून गेलेत. हे कठपुतळी बाहुले भाजपच्या इशाऱ्यावर नाचताहेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केला.

निवडणूक आयोग कसं वागतोय. चार तासांत निर्णय देणं. दिलेल्या माहितीची छाननी न घेणं. नोटरीची माहिती न घेणं, यावरून निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर निर्णय देतो, हे समजतं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेत. विश्वासघातकी पक्ष म्हणजे भाजप आहे. ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मी सांगणार.

जी पाऊलं पडत होती. ती योग्य नाही. यांनी लोकशाही मानायचीच नाही, असं ठरविलंय. बाबासाहेबांच्या संविधानाकडं दुर्लक्ष केलंय.

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे गुलाम झाले आहेत. हे जगाला कळलं आहे. निवडणूक आयोग ही न्यायिक संस्था आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून निर्णय देतात, हे योग्य नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणतात. तेव्हा देशाच्या लोकशाहीवर, घटनेवर घाव घातला जात आहे, हे स्पष्ट आहे, असा घणाघातही सावंत यांनी केला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...