AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली.

चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं, अरविंद सावंतांचा इशारा कुणाकडं?
केंद्रीय गृहमंत्र्यांवर अरविंद सावंतांचा हल्लाबोलImage Credit source: tv 9
| Updated on: Oct 09, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठविलं. यासंदर्भात अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं (Election Commission) चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे.

अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही.

या पद्धतीनं भाजपचे नेते वागणूक देतील, असं वाटत होतं. देशाचे गृहमंत्री म्हणतात खरी शिवसेना शिंदे गटाची आहे. म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

ते म्हणाले, भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पाच वर्षे काही होणार नाही. सर्व जनतेला कळतंय, हे महत्त्वाचं आहे. शिंदे गटातील लोकं हे शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून गेलेत. हे कठपुतळी बाहुले भाजपच्या इशाऱ्यावर नाचताहेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केला.

निवडणूक आयोग कसं वागतोय. चार तासांत निर्णय देणं. दिलेल्या माहितीची छाननी न घेणं. नोटरीची माहिती न घेणं, यावरून निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर निर्णय देतो, हे समजतं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 56 आमदार निवडून आलेत. विश्वासघातकी पक्ष म्हणजे भाजप आहे. ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय मी सांगणार.

जी पाऊलं पडत होती. ती योग्य नाही. यांनी लोकशाही मानायचीच नाही, असं ठरविलंय. बाबासाहेबांच्या संविधानाकडं दुर्लक्ष केलंय.

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हे गुलाम झाले आहेत. हे जगाला कळलं आहे. निवडणूक आयोग ही न्यायिक संस्था आहे. कुणाच्यातरी सांगण्यावरून निर्णय देतात, हे योग्य नसल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश म्हणतात. तेव्हा देशाच्या लोकशाहीवर, घटनेवर घाव घातला जात आहे, हे स्पष्ट आहे, असा घणाघातही सावंत यांनी केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.