AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! ‘मुंबईला याल तर सगळे मरतील’, विमानात सापडली धमकीची चिठ्ठी

इंडिगो एरलाईन्सच्या चेन्नईवरून मुंबईला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विमानाच्या स्वच्छतागृहात धमकीची चिठ्ठी सापडली आहे.

धक्कादायक! 'मुंबईला याल तर सगळे मरतील', विमानात सापडली धमकीची चिठ्ठी
| Updated on: Feb 13, 2024 | 7:14 PM
Share

ब्रिजभान जैसवार, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : चेन्नईहून मुंबईच्या दिशेला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही चिठ्ठी नेमकी कुणी दिली? असा प्रश्न विमानाच्या क्रू मेंबर्सना पडला. पण तरीही त्यांनी न भीता संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याचा निश्चय केला. विमान आकाशात असताना अशाप्रकारची चिठ्ठी सापडणं हे खरंच गंभीर आहे. कारण विमानात बसलेल्या प्रवाशांना आपातकालीन परिस्थितीत बाहेर पडताना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे विमान प्रवासावेळी संपूर्ण प्रकारची काळजी घेतली जाते. असं असलं तरी मुंबईत येणाऱ्या एका विमानात धमकीची चिठ्ठी सापडली.

नेमकं काय घडलं?

इंडिगो एरलाईन्सच्या चेन्नईवरून मुंबईला येणाऱ्या विमानात धमकीची चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे. विमानाच्या स्वच्छतागृहात धमकीची चिठ्ठी सापडली आहे. “मुंबईला याल तर सगळे मरतील”, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, टिशू पेपरवर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. विमान मुंबईला लँड करण्याच्या काही मिनिटांपूर्वी धमकीची चिठ्ठी सापडली.

केबिन क्रूच्या निदर्शनास चिठ्ठी येताच त्यांनी तात्काळ पायलटला कळवलं. कॅप्टनने तात्काळ एअर ट्राफिक कंट्रोलला माहिती दिली. त्यानंतर विमान मुंबईत लँड करताच संपूर्ण विमानाची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली. विमानात काहीही संशयास्पद न सापडल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.